Posts

Showing posts from February, 2022

काही सनदी अधिकारी : माझाही एक अनुभव

*काही सनदी अधिकारी : माझाही एक अनुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  >> दि.07.09.2016 च्या 'लोकमत' मध्ये रामचंद्र गुहा यांचा एक लेख प्रकाशित झालेला होता. त्यात त्यांनी विधान केले होते की, IAS अधिका-यांमध्ये 'अल्पमतिधारकांची' संख्याच जास्त आहे. त्यांनी काही उदाहरणे सुद्धा दिल्याचे स्मरते. तसेच त्यांनी त्यावरील काही उपाययोजना सुद्धा सुचविल्या होत्या. त्यांनी त्या लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी बहूतेक भुक्तभोगी भारतीय सहमत सुद्धा असतील. तरी या सनदी सेवेत काही सन्माननीय अपवाद सुद्धा आहेत हे नाकारता येणार नाही.  >> माझ्या 30 वर्षाच्या महाराष्ट्रातील प्रशासकीय/राजपत्रित पदावरील सेवेचा अनुभव जमेस घेता मला सर्वश्री संजीव जयस्वाल, डाॅ. हर्षदीप कांबळे, संजय देशमुख, निरंजनकुमार सुधांशु, श्रावण हर्डीकर, अश्वनी मुद्गल, सुधीर ठाकरे, हर्षवर्धन गजभिये, डाॅ. विजय सूर्यवंशी, पृथ्वीराजसिंह बायस, विजय माथनकर, फिलीप, सुश्री आभा शुक्ला, यांच्यासारखे सन्माननीय अपवाद (मला) अनुभवता आले. सर्वश्री किरण गीत्ते, श्रीकांत यांच्या सुखद अनुभवाचे किस्से वाचता आले.  >> तथापि गडचिरोली येथे ...

कोरोना-पश्चातची "चला निसर्गाकडे"ची अपरिहार्य हाक आणि मी...

*कोरोना-पश्चात ची "चला निसर्गाकडे" ची अपरिहार्य हाक आणि मी....* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी अविभाजित भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगांव या तत्कालीन अंदमान-निकोबार सदृश्य (आवागमनाच्या दृष्टीने) एका आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित तालुक्यात तालुका सहकार निबंधक असताना 1997 मध्ये भंडारा अर्बन सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन गोंदिया या शहरात (शरद पवार गोंदिया ला मिनी-मुंबई म्हणतात) एक 30×60 फूट क्षेत्रफळाचा प्लाॅट/भूखंड खरेदी केला होता. निवृत्तीनंतर गोंदिया या शहरात स्थायिक होण्याच्या इराद्याने मी तो भूखंड खरेदी केला होता. >> मी 1995 पासून अर्जुनी/मोरगांव या आवागमनाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम स्थानी असलेल्या गावात (तालुका स्थळी) कार्यरत होतो. माझा तीन वर्षांचा विहित कालावधी केव्हाच लोटला तरी तेथून अन्यत्र माझे स्थानांतर होण्याची काही चिन्हे दिसेनात. अखेर जुन-1999 मध्ये मी अपत्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी लाखनी (जि.भंडारा) येथे माझे जुने मित्र भैय्याजी बावनकुळे यांच्याकडे भाड्याने घर घेऊन लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात मुलीला अकरावीत व मुलाला नववीत प्रवेश देऊन दिला. आण...

गझल आणि न-गझल : माझे नम्र आकलन (16/02/22)

*गझल आणि न-गझल : माझे नम्र आकलन* --------------------------------------------------------- >> गझल हा असा काव्यप्रकार आहे की तो प्रत्येक रसिक, वाचकाला आवडतोच आवडतो. गझल आवडत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अर्थातच मीही त्याला अपवाद नाहीच.  >> परंतु प्रयत्न करूनही मला गझल वश होऊ शकलेली नाही. कदाचित माझा स्वभावच त्याला नडला असावा. आणि वश न झालेल्या गझलेला जोरजबरीने/वशीकरणाद्वारे आपल्या वशमध्ये आणावे इतका मी मुजोर, मुर्ख, बढाईखोर नाही.  >> त्यामुळेच मी गझल लिहिण्याची हिंमत केली नाही/करीत नाही. तथापि गझलेसारखी 'दिसणारी' पण गझल 'नसणारी' अशी रचना मी सुरूवातीपासूनच करीत आलो आहे. अशा 'गझल नसणाऱ्या/नसलेल्या' माझ्या तत्सम(?) रचनेला काय नाव द्यावे हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता.  >> अशातच मी न-नाटक, न-कथा, यांच्या धर्तीवर न-गझल असे नाव स्वीकारून तशा तत्सम(?) रचना करू लागलो. पण माझे मित्रश्रेष्ठ गझलकार श्री.सदानंद डबीर (मुंबई) यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले की, यापूर्वीच 'न-गझल' ही संज्ञा कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी वापरली असून त्या...

अरण्याचे नंगधडंग होणे (एक कविता, एक लघुकथा)

*अरण्याचे नंगधडंग होणे* ~~~~~~~~~~~~~~~~~ दोष जरासाही नव्हता पानगळीचा  पानेच पिवळसर होऊन  म्हातारपणाकडे झुकू लागली होती  निसर्गाने प्रचलित नियम अनुसरत  वाऱ्याला मोकळीक दिली होती वाऱ्याची भूमिका सुद्धा सहायकच होती  आणि हळूहळू सारे अरण्य  नंगधडंग होऊन बसले.  तेव्हा नीमवृक्षाने परिस्थिती हातात घेतली, नीमवृक्ष या वैराणातही बहरू लागला  पलाश लालभडक होऊन पेटू लागला  अमलतास आपली सोनेरी पुष्पे फडकावू लागला  अस्वलांनी मोहफुले खाऊन मस्ती केली  मग नंगधडंग अरण्याचे नागवेपण  उफाळून वर येऊ लागले  हळूहळू त्याचाही हिरवटपणा उगवू लागला अरण्याचे नंगधडंगपण  सृजनाला अनुकूल होऊ लागले. ¤ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया. (11/02/2022) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~   *अरण्याचे नंगधडंग होणे*  (एक लघुकथा) ---------------------------------------------------- >> पानगळीचा जरासाही दोष नव्हता. अरण्यातील वृक्षावरील सारी पाने म्हातारपणाकडे झुकून पिवळसर होऊ लागली होती. निसर्गाने आपला प्रचलित नियम अनुसरत वाऱ्याला मोकळे रान करून दिले होते....

इब्ने शफी की जासूसी दुनिया.....

*इब्ने शफी की जासूसी दुनिया* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी जर विसरत नसेन तर माझ्या तत्कालीन हायर मॅट्रीक (अकरावी मॅट्रीक) व महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 1970 ते 1980 या कालावधीत हिंदी भाषेत जासूसी कथा/कादंबऱ्यांचे एक पाक्षिक किंवा मासिक प्रकाशित व्हायचे. त्याचे नाव होते 'जासूसी दुनिया' आणि लेखक होते इब्ने शफी. त्या अंकातून दर पंधरवड्यात/महिन्यात नवनवीन(!) जासूसी कथा/कादंबरी प्रकाशित केल्या जायच्या. मी सुमारे पन्नासेक तरी अशा जासूसी कथा/कादंबऱ्या वाचल्या असाव्यात. >> शिवाय विविध पाॅकेट बुक्स अंतर्गत गुलशन नंदा, रामानंद सागर, राजवंश, रानू, गुरुदत्त, शिवानी, ... आदिंच्या हिंदी कादंबऱ्या/उपन्यास सुद्धा दर महिन्या-दोन महिन्यात प्रकाशित केल्या जायच्या. अशा सुमारे पाचेकशे कादंबऱ्या/उपन्यास मी वाचल्या असाव्यात. त्यामुळे माझे हिंदी भाषेवर चांगलेच प्रभुत्व(?) होऊ लागले होते. मिडलस्कूल मध्ये वर्धा आणि पुणे येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या परिचय, प्रबोध, प्रवीण, वगैरे परीक्षा उत्तीर्ण झाल्याने माझा हिंदी साहित्याशी प्राथमिक/प्रारंभिक परिचय सुद्धा...

वणवा (एक लघुकथा)

*वणवा* (एक लघुकथा) --------------------------------- >> तो धावत धावतच शेतात पोचला. तोवर वणव्याने त्याच्या शेताला वेढून टाकले होते. वन विभागाची टीम वणवा विझवण्यात मग्न होती.  >> उन्हाळ्याचे दिवस आणि वाहता वारा यामुळे वणवा आटोक्यात येत नव्हता. क्षणार्धात वणव्याने त्याच्या शेतात शिरकाव केला.  >> त्याच्या डोळ्यादेखत त्याचे शेत पेटू लागले. तो आरडाओरडीशिवाय काहीच करू शकत नव्हता.  >> वन विभागाच्या टीम ने जंगलातील वणवा कसाबसा आटोक्यात आणला व टीम आपले काम आटोपून निघून गेली.  >> त्याचे शेत पेटतच राहिले व तो नाईलाज होऊन पेटत्या/जळत्या शेताकडे फक्त एकटक पाहत बसला. ¤ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया. (11/02/2022) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आणखी एक अनुत्तरीत पत्रव्यवहार.....

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया,  दि.12.10.2019 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रति, मा.श्री.सुहास कुलकर्णी, संपादक, महाराष्ट्र दर्शन.  समकालीन प्रकाशन, पुणे-30 सप्रेम सादर नमस्कार.  >> मी, लखनसिंह कटरे, (निवृत्त जिल्हा सहकार निबंधक)! मी मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार (विद्यमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग) विभागात, MPSC द्वारे निवड होऊन, राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होऊन फेब्रुवारी-2013 मध्ये निवृत्त झालो. या दरम्यान मी पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे सह), मराठवाडा (औरंगाबाद, बीड सह), विदर्भ (गडचिरोली ते यवतमाळ सह) या भागात नोकरीनिमित्त सपरिवार सह-निवास केला आहे. कोंकण व खान्देश भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी मी सपरिवार सह-निवास केला असल्याने व सहकार, पणन हा विभाग मुख्यतः ग्रामीण महाराष्ट्राशी सर्वाधिक संबंधित असल्याने मला या भागातील संस्कृती, इतिहास, समाजजीवन/ग्रामजीवन, लोकसाहित्य, पर्यावरण, शेती, इ. संदर्भात जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली आहे/होती.  >> निवृत्तीनंतर मी कोणत्याही शहरी/नागरी ...

राक्षस आणि मी (एक लघुकथा)

*राक्षस आणि मी* (एक लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~ ¤ रोजच्या सारखाच आजही माॅर्निंग वाॅक ला गेल्तो. येतांना रस्त्यात एक "राक्षस" भेट्ला. मला आडवा झाला, मी नाईलाजाने थांब्लो.  ¤ राक्षस म्हण्ला- "खूप भूक लागलीय, तुला खातो आता."  ¤ मी थोडासा गांगर्लो...सावर्लो... म्हणालो, नाही म्हटलं तरी तू ऐकणारेस थोडाच, खा मग मला...!  ¤ तो माझ्या आसपास फिर्ला, मला न्याहाळू लाग्ला, माझा वासही घेत्ला व वेडेवाकडे तोंड करून म्हणाला..."जा तू, तू मला पचणार नाहीस. आजही आता उपवासच..."  ¤ त्याला पुनर्विचाराची संधी न देता मी तेथून लगेच सटक्लो, म्हणून तुम्हाला हे सांगू तरी शक्लो. हुश्श...! ¤ @खिलीराम भाऊ.(ॲड.लखनसिंह कटरे) बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (06/02/2018)

जंगलगाथा : कवितासंग्रह : रमेश सावंत // हृदयाचे डोळे उघडून...

□"जंगलगाथा : कवितासंग्रह : रमेश सावंत□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ◇"हृदयाचे डोळे उघडून....."◇ ---------------------------------------       माझा एक अष्टपैलू साहित्यिक मित्र मुंबईत राहतो. मूळचा गाववासी असून अजूनही तो "गावाच्या भूमीचा वास" संपूर्ण व्यक्तिमत्वात भरून शहरवासी झालेला हा मित्र म्हणजे खरा NRV.(Non-Resident Villager). ह्या अष्टपैलू साहित्यिक मित्राचे नाव रमेश सावंत. याचा "जंगलगाथा" हा कवितासंग्रह मला जून-2018 मध्येच मिळाला. मिळताच तो मी चाळला आणि थक्क झालो. फूरसतीमध्ये वाचण्या/अनुभवण्यासाठी वाचन-प्रतीक्षा यादीत राखून ठेवला. आज पहाटेपासून मी हा कवितासंग्रह वाचतो आहे. हृदयाचे डोळे उघडून वाचतो आहे. किंवा असे म्हणता येईल की, हा संग्रह वाचण्या/अनुभवण्यासाठी हृदयाचे डोळे उघडावेच लागतात.       "वाचायला हवं जंगल" या पहिल्याच कवितेत कवी म्हणतो... "म्हणूनच हृदयाचे डोळे उघडून बघायला हवी निरखून सृष्टीच्या कुंचल्यातून घडलेली निःशब्द, पण हृदयंगम कविता..."     माझ्यासारख्या महाराष्ट्रातील मोठमोठी शहरे अनुभवून शेवटी झाडीपट्टीतील छोट्याशा गा...

उजाखानंतरचे सत्योत्तर युग व मानसिकता

*उजाखानंतरचे सत्योत्तर युग व मानसिकता* ------------------------------------------------------- >> उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) काळातील बुद्धिमत्ता, परीक्षा, स्पर्धा, स्वकेंद्रित प्रगती, तुच्छतावाद, विवेकशून्यता सारख्या बाबींचे असंवेदनशील असे उदात्तीकरण यांचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. अशा या विवेकवादाला थारा न देणाऱ्या कटूतम वस्तुस्थितीचे उगमस्थान दुर्दैवाने आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत असू शकते. सध्याच्या आपल्या शिक्षण पद्धतीचा भर प्रामुख्याने नोकरी मिळविण्यासाठी लागणारी कौशल्ये शिकण्या/शिकवण्याकडे असतो. वस्तूतः शिक्षणाचा उद्देश व उपयोग अर्थार्जनासाठी व्हायला हवा हे वाईट नाही किंवा ते वैगुण्याचेही म्हणता यावयाचे नाही, पण तो तेवढ्यापुरताच मर्यादित रहायला नको. शिक्षणाचा प्रमुख हेतु हा विचारी, विवेकी, सहिष्णू, संवेदनशील, माणुसकीचा धर्म पाळणारे सुजाण नागरिक घडवणे हा असायला हवा. विद्यार्थांना कोणत्याही साचेबंद शिक्षणाच्या मर्यादेत न राहता त्या पलीकडे जाऊन मूलभूत विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे शिक्षण मिळण्याची परमावश्यक गरज आहे. व्यावसायिक जगात सर्वच काही पैशांच्या म...

एका अनुत्तरीत पत्राची शोकांतिका(च).....!

प्रति, आदरणीय श्री.गिरीश कुबेर  संपादक, 'लोकसत्ता' फक्त मुंबई.  विषय :- लोकसत्ता : कविता मनोमनी : एक मोठ्ठा फार्स ... (???) सप्रेम सादर नमस्कार, >> माझा पूर्वानुभव लक्षात घेता आपला inbuilt विदर्भ-द्वेष आपल्याला माझ्या या पत्राची सुद्धा दखल घेऊ देणार नाही याची खात्री असल्याने मी हे जाहीर-पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे.  >> आज रविवार, दि.28 मार्च 2021 च्या विदर्भ-द्वेष्ट्या लोकसत्ता च्या पृष्ठ क्र.6 व 7 वर प्रकाशित 'लोकसत्ता : कविता मनोमनी' मध्ये पूर्वग्रहदूषित पद्धतीने सामील करण्यात आलेल्या कवितांचे अवलोकन करावे ही विनंती.  >> उपरोक्त पृष्ठांवर एकूण 13 (चूक-भूल बद्दल क्षमस्व! 😃) कविता सामील करण्यात आल्या असून त्यातील सर्वाधिक 8 कविता मुंबई-पुणे येथील कवींच्या, एक कविता गोवा येथील कवीची व प्रत्येकी एकेक कविता अनुक्रमे अहमदनगर, आंबेजोगाई, धुळे व एक तिकडल्याच आणखी एका कवीची कविता सामील करण्यात आल्या आहेत. त्यात विदर्भातील एकाही कवी(?)ची कविता मात्र सामील करण्यात आलेली नाही.  >> या उपक्रमासाठी कवितांची निवड करणा-या दोन्ही विदुषी कवयित्री ह्या ...

कविता : 2022 (01 ते 21)

कविता : 2022 (01 ते 21) ~~~~~~~~~~~~~~~~~ (1) *घानमाकड* ~~~~~~~~ रस्त्याची रुंदी मोजता मोजता संपले सारे जीवन तरी, जाणिली ना कला भेदण्याची घोंघावत राहिले ते अधांतरी.  'श्रावण मासी हर्ष मानसी'  ठरली कधीची हद्द नवलाईची  थकली, रुसली कल्पनाशक्ती ओलांडून हद्द पुढे जाण्याची.  बंदिस्त लेखणी परीघात आणि  स्वयंघोषित गतानुगामी सरणी  नावीन्याचे वावडे जयांना तेच  रुजलेल्या त्या वाटेवरचे सेनानी.  चक्रव्यूह तो जुनाच रेंगाळलेला  भेदून जाण्याची मरगळ पृच्छा  जंगलेली तलवार घेऊन हाती  बाळगती अजागळ भ्रमित इच्छा.  लोलक फिरवून गोलगोल सदा  वर्तुळातील क्लृप्त्या न्याहाळती  वास्तव सारे अस्ताव्यस्त पडलेले  देखूनही डोळे मिचकावून जाती. सीमेपारचे क्षितिज ते अनाघ्रात  जाणिले ना जाणवले कधी  दुरूनच डोंगर साजरे करण्यात  निसटून जाते पायाखालील संधी. ¤ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया  (11.01.2022) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (2) *लांडगा आला रे आला...!* --------------------------------------- तालीमही नाटकाची आता फसू लागली आ...