Posts

Showing posts from May, 2026

अवगुणांचे गुणगान आणि करंटेपणाची संस्कृती : समर्थांच्या ओवीतून आधुनिक मनुष्याचा शोध

*अवगुणांचे गुणगान आणि करंटेपणाची संस्कृती : समर्थांच्या ओवीतून आधुनिक मनुष्याचा शोध*                   @अ‍ॅड.लखनसिंह कटरे, ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ “सकल गुणांमध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ।।”  (दशक 19, समास 8, ओवी 8)        समर्थ रामदास यांच्या श्रीदासबोध मधील ही ओवी केवळ नैतिक उपदेश नाही; ती मानवी मनोविज्ञानाचे अत्यंत सूक्ष्म, भीषण आणि आजच्या काळात अधिकच लागू पडणारे विश्लेषण आहे. माणूस जेव्हा स्वतःच्या अवगुणांनाच गुण समजू लागतो, तेव्हा त्याचा नैतिक अध:पात सुरू होतो. पण त्याहून धोकादायक अवस्था ती असते, जेव्हा त्याला त्या अध:पाताचे भानही राहत नाही. समर्थांनी त्यालाच “करंटपण” म्हटले आहे.       आजच्या उत्तर-आधुनिक, सत्त्योत्तरीय बाजारकेंद्री, प्रतिमाप्रिय आणि स्वार्थप्रधान समाजात ही ओवी अधिकच भयावहपणे खरी वाटते. कारण आता अवगुण लपवले जात नाहीत; उलट त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन केले जाते. खोटेपणा “व्यवहारकुशलता” ठरतो, संधीसाधूपणा “प्रॅक्टिकल बुद्धिमत्ता” ठरते, बेशरम आ...

मराठी नियतकालिकांचे अपमृत्यू : कंपूशाही, अहंकार आणि वाचकद्रोहाचे सांस्कृतिक राजकारण*

*मराठी नियतकालिकांचे अपमृत्यू : कंपूशाही, अहंकार आणि वाचकद्रोहाचे सांस्कृतिक राजकारण* @ॲड. लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       मी सुमारे १९६८ पासून मराठी नियतकालिकांचा सातत्यपूर्ण वर्गणीदार वाचक आहे. 'ललित'पासून सुरू झालेला हा प्रवास सत्यकथा, अभिरुची, वाङ्मयशोभा, मनोरा, आलोचना, पंचधारा, मराठी साहित्य पत्रिका, मराठी संशोधन पत्रिका, युगवाणी, अनुष्टुभ, कविता-रती, कविताश्री, अंतर्नाद, उगवाई अशा अनेक नियतकालिकांतून पुढे गेला. या प्रवासात मी केवळ वाचक म्हणून नव्हे, तर एक निरीक्षक म्हणूनही मराठी साहित्यविश्वाकडे पाहत राहिलो. आणि त्या निरीक्षणातून मला वेळोवेळी एक कठोर निष्कर्ष काढावा लागला की — काही तथाकथित प्रतिष्ठित मराठी नियतकालिकांनी आपल्या अपमृत्यूची बीजे स्वतःच स्वतःच्या पोटात पेरून ठेवली होती.      विशेष म्हणजे, या संदर्भातील माझे आकलन किंवा भविष्यसूचना मी संबंधित नियतकालिकांच्या संपादक, प्रकाशक, संचालक, मालकांना वेळोवेळी कळविलेल्या आहेत. अजूनही तो पत्रव्यवहार माझ्याकडे सुरक्षित आहे. त्यामुळे मी आज जे काही लिहित आहे, ते नंतरचे शहाणपण नसून दीर्घका...