अवगुणांचे गुणगान आणि करंटेपणाची संस्कृती : समर्थांच्या ओवीतून आधुनिक मनुष्याचा शोध
*अवगुणांचे गुणगान आणि करंटेपणाची संस्कृती : समर्थांच्या ओवीतून आधुनिक मनुष्याचा शोध* @अॅड.लखनसिंह कटरे, ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ “सकल गुणांमध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ।।” (दशक 19, समास 8, ओवी 8) समर्थ रामदास यांच्या श्रीदासबोध मधील ही ओवी केवळ नैतिक उपदेश नाही; ती मानवी मनोविज्ञानाचे अत्यंत सूक्ष्म, भीषण आणि आजच्या काळात अधिकच लागू पडणारे विश्लेषण आहे. माणूस जेव्हा स्वतःच्या अवगुणांनाच गुण समजू लागतो, तेव्हा त्याचा नैतिक अध:पात सुरू होतो. पण त्याहून धोकादायक अवस्था ती असते, जेव्हा त्याला त्या अध:पाताचे भानही राहत नाही. समर्थांनी त्यालाच “करंटपण” म्हटले आहे. आजच्या उत्तर-आधुनिक, सत्त्योत्तरीय बाजारकेंद्री, प्रतिमाप्रिय आणि स्वार्थप्रधान समाजात ही ओवी अधिकच भयावहपणे खरी वाटते. कारण आता अवगुण लपवले जात नाहीत; उलट त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन केले जाते. खोटेपणा “व्यवहारकुशलता” ठरतो, संधीसाधूपणा “प्रॅक्टिकल बुद्धिमत्ता” ठरते, बेशरम आ...