Posts

Showing posts from January, 2024

18 जानेवारी 2009

*18 जानेवारी 2009* ~~~~~~~~~~~~~        02 जून 2008 ला मी स्वेच्छेने यवतमाळ येथून बदली करून घेऊन गडचिरोली येथे जिल्हा उपनिबंधक(डीडीआर), सहकारी संस्था या महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या जिल्हा प्रमुख पदावर रुजू झालो.         गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभाव खरोखरच समाप्त करावयाचा/व्हावयाचा असेल तर त्यासाठी सहकार ही संकल्पना रामबाण उपाय ठरू शकते, हे मी यापूर्वीच अभ्यासले होते. त्या दृष्टीकोनातून मी माझ्या कामाची आखणी करून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.गडचिरोलीचे मा.अध्यक्ष श्री प्रंचित पोरेड्डीवार, संचालक श्री पोरेड्डीवार, बँकेचे सरव्यवस्थापकद्वय श्री मुद्देशवार व श्री चौधरी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी तथा तत्कालीन जिल्हाधिकारी श्री निरंजन कुमार सुधांशु यांच्या सक्रिय सहकार्याने कामकाजाला सुरुवात केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी भागात परंपरागत पद्धतीने कापूस पीक घेण्यात येत असले तरी तोवर महाराष्ट्र शासनप्रणित कापूस खरेदी योजनेचे एकही केंद्र गडचिरोली जिल्ह्यात सुरूच करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्...

ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)

*ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~~~~ >> भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. (संदर्भ : गांधीविचार). ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत, शाश्वत व टिकाऊ असल्या/झाल्याशिवाय एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचे सुदृढ मंदिर उभेच राहू शकत नाही. पाया मजबूत असेल तर आणि फक्त तरच इमारत मजबूत हीते व शिखरही मजबूत होऊ शकतो, हा निसर्गाचा अकाट्य नियमच आहे!  (एखाद्याला दिवसाढवळ्या सूर्याकडे तोंड करून डोळे झाकून आता रात्र आहे, असेच मुजोरीने प्रतिपादन करावयाचे असल्यास त्यावर (भारतात तरी) कोणताही इलाज नाही.)   >> भांडवली विकास प्रणित अर्थव्यवस्थेच्या वृद्धी(ग्रोथ)वर भर दिला तर विकासाची फळे कालांतराने आपोआप तळागाळातील स्तरापर्यंत पोहचतील हा "झिरप सिद्धांत" प्रत्यक्षात निकामी व असफलच ठरतो, शिवाय अशी भांडवली विकास प्रणित अर्थव्यवस्थेत प्रत्येक घटकाला न्याय मिळत नाही हा आजवरचा जागतिक अनुभव आहे. किंबहुना, ग्रामीण व्यवस्थेतील शेतकरी या वंचित घटकासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, तर ते वंचितच राहतात...

अनुभव : एक भ्रम?.....की?

*अनुभव : एक भ्रम?....की?* ~~~~~~~~~~~~~~~ >> जीवनात सर्वांगीण व शाश्वत यशस्वीतेसाठी जे सहा सूत्र सांगितले जातात, त्यातील सहावे सूत्र "गणिती वृत्ती" हे आहे. या "गणिती वृत्ती" ची व्याख्या मात्र प्रत्येकाने आपापल्या मगदूराप्रमाणे करावयाची असते. मी त्यासाठी मला सुचलेला कच्चा माल येथे पुरवत/टाकत आहे. कोणी जाणकाराने त्यावर मार्गदर्शन करून "व्याख्ये"कडे जाण्याचा रस्ता दाखवला तर त्यांचे आभार होतील!     2 व 3 "मिळून" किती होतात वा होतील? 2+3, 2-3, 2×3, 2÷3, 3-2, 3÷2, 2 चा वर्ग,  3 व/वा 2 चा वर्गमुळ, 2 चा घनमुळ , 3 चा वर्ग,  2 व/वा 3 चा वर्गमुळ, 3 चा घनमुळ, 23, 32,..... इत्यादी...!       म्हणजे मी गोंधळलो की कोणाला तरी गोंधळवतो? एखादी घटना, एखादा प्रसंग घडल्यावर त्यावरील प्रत्येकाची/चा प्रतिक्रिया व अभिप्राय सारखी/खा च रहावी/वा, असा अट्टाहास धरता/करता येईल काय? "होय" असेल तरी आणि "होय" नसेल तरी......योग्य, सत्य, सर्वमान्य कोणते? कां?          मी मूलतः विज्ञान आणि गणिताचा विद्यार्थी असून विधीशास्त्र, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन शास्त...

वाङ्मयीन अस्पृश्यता...!

□वाङ्मयीन अस्पृश्यता...!□ ~~~~~~~~~~~~~~~ (18.11.2017) ~~~~~~~~~~~~ ------>>> तथाकथित कम्युनिस्ट विचारसरणीच्या मुंबईस्थित एका प्रकाशन मठा(?)च्या मुखपत्राच्या सु(?)प्रसिद्ध संपादकांचा मला आलेला अनुभव...      त्या संपादकांशी झालेल्या +ve चलभाष "मैत्रीचा" गैर(?)फायदा घेऊन दि.09.02.2016 ला माझ्या दोन कविता या संपादकांकडे (अनाहूत पणे) प्रकाशनार्थ पाठविल्या असता दि.09.05.2016 ला चलभाष द्वारे (संपादकांनी स्वतः) कविता "नापसंती" कळविली. मी हसून म्हणालो, "मला तशी थोडीशी खात्री होतीच." असो. तरी पुन्हा (बेशरमपणे) दि.23.05.2016 ला पोस्टाने आणखी एक कविता प्रकाशनार्थ पाठविली. दि.16.12.2016 पर्यंत काहीच न कळल्याने पुन्हा दि.16.12 ला च आणखी एक कविता (पुन्हा बेशरमपणे) इमेल ने प्रकाशनार्थ पाठविली. दि.23.04.2017 पर्यंत या दोन्ही कवितांबद्दल काहीच "न" कळल्याने पुन्हा दि.23.04 ला च इमेल द्वारे याबाबत थोड्याशा "नाराजी"च्या सुरात (नकार/होकार) निर्णयाची विनंती केली. तेव्हा संपादकांचा इमेल आला की या दोन्ही कविता (पोस्टाने पाठविलेली व इमेल ने पाठविलेली स...