Posts

Showing posts from June, 2019

अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके...

अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       ' आधुनिक' या काल-सापेेक्ष भासणा-या पण प्रत्यक्षात काल-सुसंगत असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद व्याख...

राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र (एक लघुकथा)

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,       दि.15.02.2019 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र...     ----------------------------------------------        राजा तैलादित्य हा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे राज्य फक्त सत्तावीस गावापुरतेच होते, त्यामुळे इतिहासात त्याची नोंद दिसून येत नाही. राजा तैलादित्य ला तत्कालीन रिवाजाप्रमाणे तीन प्रमुख राण्या होत्या. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. शिवाय बिन-लग्नाच्या काही बायका व दासी होत्याच राणीवशात. पहिल्या राणीला, बायजादेवीला दोन्ही कन्याच होत्या. त्यांची नावे अनुक्रमे सुरेखादेवी आणि अरुणादेवी. उर्वरित दोन्ही राण्यांना औलाद नव्हती. राजवैद्याने सारे औषधोपचार व राजपुरोहिताने सर्व प्रकारचे नवसादि-पूजापाठ करूनही ह्या दोन्ही राण्यांना काही अपत्य-लाभ होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या राणीचा वचक जरा जास्तच होता. जरी राजा तैलादित्य नंतर राजगद्दीवर बसणारा राजपुत्र नसला तरी दोन सुस्वरुप व सालस कन्या असल्याने बायजादेवीचे महत्व उर्वरित दोन्ही राण्यांप...

राजा कोमलादित्य ची कथा (एक लघुकथा)

     □"राजा कोमलादित्य ची कथा..."      •••••••••••••••••••••••••••••••••       राजा ललितादित्य हा अतिशय प्रजाहितदक्ष असा लोकप्रिय राजा होता. त्याचा अमात्य मिरचूमल हा सुद्धा अतिशय प्रामाणिक, राजनिष्ठ असा चतुर राजनितीनिपुण व्यक्ती होता. दोघांनी मिळून आपल्या राज्याची त्यांनी चांगलीच भरभराटी केली होती. साहित्य, कला, संस्कृती या विषयांतही त्यांच्या राज्यात समृद्धी होती. राजा ललितादित्य स्वतः एक उत्कृष्ट कवी होता. संगीताचा तो जाणकार होता. त्याच्या दरबारात एकूण बारा संगीतकार होते, जे दिवसाच्या प्रत्येक प्रहराला पूरक-साजेशा संगीत-गायनासाठी सुप्रसिद्ध होते. मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ इतके प्रवीण होते की ललितादित्यच्या राज्यात कधीच दुष्काळ पडत नव्हता. आवश्यकतेनुसार पाऊस पाडण्यात मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ शतप्रतिशत सफल होत होते. अशा राजाला संतती नसल्याने तो कधीकधी उदास व्हायचा.         राजा ललितादित्यला मुख्य चार राण्या होत्या. नविनादेवी, आईनादेवी, प्रवीणादेवी व कामुनादेवी ही त्या राण्यांची नावे. नविनादेवीचे चार गर्भपात झाले हो...

राजा समरादित्य आणि त्याची झोप (एक लघुकथा)

   □राजा समरादित्य आणि त्याची झोप...              ---(एक लघुकथा)---   --------------------------------------     राजा समरादित्य आणि त्याचा अमात्य ढाडूमल वेष बदलून रयतेचा आढावा घेत होते. राजाने व्यापा-याचा व अमात्याने त्याच्या सहाय्यकाचा वेष परिधान केला होता. दोघेही अप्रशिक्षित घोड्यांवर स्वार होऊन रयतेचा आढावा घेता घेता सायंकाळ केव्हा झाली हे त्यांना कळलेच नाही. चालता चालता ते एका नदीकिनारी पोचले. वसंत ऋतूला नुकतीच सुरुवात झाली होती. नदीकिनारी पळस आपली थंड आग ओकत बसला होता. आणि अशातही नदी मात्र दुथडी भरून वाहत होती. नदीकिनारीची सुनसान झालझुल एकांताला आणखी एकांतात बुडवत होती. अशावेळी राजमहालात लवकर पोहचणे राजाला आवश्यक वाटू लागले. पण नावेशिवाय नदी पार करणे शक्य नव्हते. वेष बदलून रयतेचा आढावा घेताना मागे परतू नये, असा राज पुरोहिताचा आदेश-वजा-सल्ला असल्याने मागेही परतता येत नव्हते.        अमात्य ढाडूमल एका उंचशा पळसाच्या झाडावर चढून आसपास, आजूबाजूला कोणी नावाडी आहे काय याची चाचपणी करू लागला. पण अशी कोणतीही ...

दत्तप्रसाद दाभोळकर आणि "इतिहास आढळत नाही"

□गडचिरोलीच्या छायेतील कविता : "इतिहास आढळत नाही" (दीर्घ कविता : लखनसिंह कटरे) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        □दत्तप्रसाद दाभोळकर.        काही कवी लक्षवेधी असतात -- लक्षणीयही असतात. आपण नकळत त्यांच...