Posts

Showing posts from December, 2020

काही मूर्खपणाच्या शंका/कुशंका......!!

□काही मुर्खपणाच्या शंका/कुशंका!!□ -------------------------------------------------- 1)मी एलएल.बी.(1981) करत असताना आम्हाला "नैसर्गिक न्याय तत्व" (Principle of Natural Justice) शिकवताना आमचे प्रोफेसर न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन सांगायचे की, हे तत्त्व कोणत्याही कायद्यात "व्याख्यायित" केले नसले तरी हे तत्त्व कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा मूलभूत पायाच असते. केलेली कार्यवाही कितीही योग्य(?) असली तरी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुपालन करणारी नसेल तर ती कार्यवाही या तत्त्वाचे अनुपालन न केल्याच्या तांत्रिक कारणावरून सुद्धा न्यायालय निरस्त/रद्द करू शकतात/करतात.  आताही हे "नैसर्गिक न्याय तत्त्व" न्यायालयीन निर्णयात पाळले जात असावे काय? 2)मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असताना (30 वर्षांत) हजारो न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय पारित केले होते. आणि त्यातील एकसुद्धा निर्णय कोणत्याही न्यायालयात निरस्त वा रद्द झाल्याचे "मला आढळून आले" नाही. (अपवाद : मंत्री स्तरावरील व विभागा...

माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम

*माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 1.बहुतेक हिंदूंनी त्यांचे धर्मग्रंथ वाचलेलेच नाहीत. भटजी किंवा  चार्वाक किंवा हिंदूधर्म-विरोधक जे काही सांगतील तेच ते सत्य मानतात. 2.बहुतेक मुस्लिमांनी पवित्र कुराण वाचलेलेच नाही, फक्त शब्दोच्चारण तेवढे कदाचित केले असेल पण मूळ भाषाच येत नसल्याने अर्थ कळलेला नाही. मुल्ला-मौलवी, कट्टरवादी जे सांगतील तेच ते सत्य मानतात. 3.बहुतेक ख्रिश्चनांनी बायबल मधील जून्या करारातील उत्पत्ती हे प्रकरण वाचलेलेच नाही. फ्रेडरिक नित्शे बायबलबद्दल काय म्हणालाय हे सुद्धा बहूतेकांना ठाऊकच नाही.   4.दास कॅपिटल न वाचताच त्यावर भाष्य करावे ही बहूतेक भारतीय कम्युनिस्टांची खासियत आहे. (मी दास कॅपिटल वाचून भयंकररित्या confuse झालो होतो. ) 5.सुरेश द्वादशीवार नावाचे एक original विचार करणारे तत्वचिंतक भारतात आहेत व त्यांनी त्यांचे तत्वचिंतन ग्रंथांतून मांडले आहे, हे आम्हा बहूतेक भारतीयांना (विशेषतः महाराष्ट्रीयनांना) माहीतच नाही. 6.योगी अरविंदांनी केलेल्या thinkophobia च्या मांडणीचे आम्ही बहुतेक भारतीय अजूनही तंतोतंत पालन...

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची "विचारधारा" आणि वर्तमान : एक आकलन.

*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची "विचारधारा" आणि वर्तमान : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~   >> डाॅ.बाबासाहेब (भीमराव रावजी) आंबेडकर यांचा जीवनप्रवास/जीवनपट पाहिला असता बाबासाहेब ख-या अर्थाने 1930 पासूनच भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि सांसदिय प्रभामंडलावर प्रभावीपणे उदित होऊ लागल्याचे/झाल्याचे दिसून येते. म्हणजेच सारांशाने जीवनाच्या उण्यापु-या फक्त 26-27 वर्षात (1956 मधील त्यांच्या निर्वाणापर्यंत) बाबासाहेबांनी भारतीय समाजाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात जो दबदबा, जो मानसन्मान, जी विद्वतमान्यता, जी क्षितिजसमांतरता प्राप्त करून घेतला/ली, ती एक अद्भुत वाटावी अशीच वस्तुस्थिती आहे. वस्तूतः कोणत्याही सबळ व सक्षम परिस्थितीच्या साथीशिवायही, सर्वार्थाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून, स्वसामर्थ्याने बाबासाहेबांनी जी उत्तुंग अशी सर्वश्रेष्ठता प्राप्त करून भारतीय जनमानसावर आपली अकाट्य अपरिहार्यता ठसविली ती जगाच्या इतिहासात बिनतोड अशीच आहे. हे आइनस्टाइनने महात्मा गांधींबद्दल वापरलेल्या शब्दातच सांगायचे झाले तर, बाबासाहेबांसारखा पुरुष या पृथ्वीतलावर होऊन गेला, ही वस्तुस्थिती ...

एक हलके फुलके... पण गंभीर सुद्धा!

*एक हलके फुलके...पण गंभीर सुद्धा !* ------------------------------------------------        गेल्या नोव्हेंबर (2018) मध्ये मी राजन खान प्रणित अक्षर मानव द्वारा आयोजित "चित्रपट कार्यशाळा" करिता मुर्टी (ता.बारामती, जि.सातारा) येथे गेलो होतो. पण तब्येतीच्या कारणांमुळे मला ती कार्यशाळा अर्ध्यावर सोडावी लागली. पण पुण्याला परत येऊन दोन आठवडे पुण्यातच थांबलो. दरम्यान मी "साधना" साप्ताहिकाचे संपादक श्री.विनोद शिरसाठ यांची भेट घेतली असता त्यांनी मला प्रभाकर पाध्ये यांचे 'असेही विद्वान' व शिरसाठ यांचे 'सम्यक सकारात्मक' ही पुस्तके भेट दिली. पैकी 'असेही विद्वान' हे मजेदार व गंभीर असे पुस्तक मी पुण्यात असतानाच वाचून काढले.        त्याच पुुुुस्त्तकातील काही उतारे "साधना" साप्ताहिकाच्या दि.15 डिसेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. (हे पुस्तक प्रत्येक विचारी मराठी वाचकाने अवश्य अवश्य वाचावेच असे माझे मत आहे.) त्या उता-यांतील अनंत काणेकर यांच्या संबंधीची आठवण वाचतांना मला माझ्या जीवनातील एक समांतर घटना आठवते.       त्यापूर्वी थोडीशी ...

शिक्षक दिवस : एक विचार मेरा भी!

*शिक्षक दिवस : एक विचार मेरा भी !* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> अक्तूबर 1978 से अप्रैल 1984 तक, लगभग छह वर्ष, मै तत्कालीन जिला परिषद भंडारा के शिक्षा विभाग के अंतर्गत गणित-विज्ञान शिक्षक की हैसियत से कार्यमग्न(!?) रहा हूँ। इस दरमियान मै शहीद जान्या तिम्या जिला परिषद हाईस्कूल तथा ज्युनिअर काॅलेज, गोरेगाव (एक शैक्षणिक सत्र), जिला परिषद हाईस्कूल तथा ज्युनिअर काॅलेज, देवरी (पांच शैक्षणिक सत्र) तथा इसी बीच जिला परिषद हाईस्कूल, कट्टीपार (आठ दिन) यहाँ शिक्षक होने का फ़र्ज निभाता(!) रहा हूँ।  >> इन लगभग छह शैक्षणिक सत्रों में मैने करीबन 2500-3000 छात्र-छात्राओं को पूरी तरह बिगड़ने/बिगाड़ने(?) में यथासंभव सहायता की है। देवरी में कार्यमग्न(?) रहते वक्त तत्कालीन प्राचार्य-कम-मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर झा तथा (दिवंगत) श्री.जगदीश मिश्रा इनके आदेश-कम-सूचना को मद्देनजर रखते हुए मुझे पाँचवी से आठवी कक्षा के छात्र-छात्राओं को गणित एवं भोतिकी ये दोनों विषय मराठी, हिंदी और अंग्रेजी माध्यम में पढ़ाने(?) का सुअवसर मिला। इन्हीं दो महानुभावों के प्रेमादेश से मुझे नौवीं से बारहवीं तक की कक्षाओं म...

मै भिगता रहा बेमौसमी बरसात में.... (एक हिंदी कविता)

*मै भिगता रहा बेमौसमी बरसात में ...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मै भिगता रहा बेमौसमी बरसात में  नही हुआ फिरभी मिलना उससे  मौन की गहराई गहराती रही  शब्दों ने नकारे फिर सारे किस्से।  ¤ चहुंओर धूम थी घुमड़ते आवाजों की  ओंठों से लफ्ज़ नही निकल पाएं  पहरेदार पहरे पर चारों ओर तत्पर  आखिर झंडे सफेद ही लहराएं।  ¤ सवाल बहुत थे जवाबों के घेरे में  आंगन में कंगना फिर भी खणकते थे  सभी सवाल दहक उठे अकस्मात   किंतु बरसात से जवाब ही गायब थे! ¤ बेमौसमी बरसात बरसती रही  भिगता रहा मै प्रांगण में बेतहाशा  मिलने की आस धुंधलाती रही  और 'ठस' गयी आशा में निराशा।  ¤ शब्दों का छल और विलास शब्दों का  मनोरम संगम में बस बहक गया  शब्दों का आधार शब्दों ने ही खोया  और शब्दों से अर्थ सारा लुढ़क गया। ¤ बरसातें होती रही मौसम-बेमौसम  भिगता ही रहा मै भी भिगते भिगते   सुकून सुकने का खो गया कहीं  मिलने की आस टूटी टूटते टूटते। ¤ @लखनपाल सिंह कटरे "अपराधी" बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (विदर्भ) (12.12.2020) ~~~~~~~~~~~~~...

अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके...

□अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके...□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       'आधुनिक' या काल-सापेेक्ष भासणा-या पण प्रत्यक्षात काल-सुसंगत असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद व्याख्या अजूनही प्रलंबितच आहे. आणि त्यामुळे आधुनिक, उत्तराधुनिक, उत्तरोत्तराधुनिक, + + + × × × ..... असे फसवे व भ्रामक शब्दप्रयोग करून/वापरून 'आधुनिक' या निसर्गतःच स्वतंत्र व स्वायत्त संकल्पनेची ऐशीतैशी करण्यात आजची विचारशैली मश्गुल असल्याचे पदोपदी व सदैव आढळून येते.        अशा या संकल्पनिक उपपत्तींच्या सम्यक आकलनाअभावी अति-सौम्य/शिथिलरित्या वापरल्या जाणा-या प्रतिगामी व पुरोगामी या विचारपद्धती सुद्धा आपापल्या रंगीबेरंगी वर्तुळात अतिरेकी रूप धारण करतात. विचारपद्धती प्रतिगामी असो वा पुरोगामी ती अतिरेकी झाली की तिचे पर्यावसान शक्तिशाली नकारात्मक परिणामाला कारणीभूत ठरण्यातच होते. आणि पर्यायाने समाज-जीवनातील एकजिनसीपणा नष्ट होऊन 'मेरे मुर्गेकी एकही टांग' ही मुजोर आणि भेदजनक वृत्ती फोफावत जाते. दुर्गंधीयुक्त विचार-डबक्यांची संख्या वाढत जाते.        ...

माझी आत्म-आलोचना ...(?)

माझी आत्म-आलोचना...(?) ~~~~~~~~~~~~~~~~ माझी मातृभाषा हिंदी असल्याने माझ्या प्रकाशित लेखनाची सुरूवात हिंदीतूनच झाली. 1980पर्यंत मी हिंदीत चांगला(!) स्थापित(!) होऊ लागलो होतो. परंतु माझे शालेय शिक्षण मराठीतून झाल्याने, B.Sc.(PCM) ला 1st year ला मराठी घेतल्याने, ग्रेस आणि वसंत आबाजी डहाके यांनी केलेल्या गारूडाने मी हिंदीला 1978 पासून हळूहळू व सुमारे 1982 पासून  पूर्णतः त्यागून मी मराठी लेखनाकडेच वळलो. मराठी साहित्याचे वाचन तसे 1965 पासूनच सुरू होते, त्याची गती मात्र आता वाढवली. माधव मनोहर या "गुप्तहेरा"चे लेखन वाचण्यात आले. त्यांनी मोठमोठ्या, नावाजलेल्या मराठी साहित्यिकांच्या पाश्चात्य परपुष्टतेची लक्तरे सार्वजनिक **घाटावर धुवून मराठीच्या वेशीवर टांगली. माझे ज्येष्ठ मित्रवर्य दत्तप्रसाद दाभोळकरांचे "ज्ञानपीठ-पुरस्कार"चे पुराण वाचण्यात आले. आणि काहीसा निराश होऊ लागलो होतो. दरम्यान आनंद यादवांशी "गोतावळा" संबंधाने पत्रसंवादही झालेला होता. तरी मराठीतील मोठमोठ्या साहित्यिकांचे "मातीचे पाय" पदोपदी आढळून येऊ लागले. मराठीतील एकेकाळी काही नावाजलेल्या(!) तर...