Posts

Showing posts from May, 2022

कवी आणि कविता, मी आणि......

*कवी आणि कविता, मी आणि ...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> विदर्भ साहित्य संघ, शाखा भंडारा / युगसंवाद, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संस्था, भंडारा / मैफल, लाखनी द्वारा संयुक्तरित्या आयोजित *कवी आणि कविता* या विशेष उपक्रमाच्या श्रृंखलेत दि.30 एप्रिल 2016 (शनिवार) रोजी आयोजित दुसऱ्या कडीचा *निमंत्रित कवी* मी होतो. आयोजक डाॅ.अनिल नितनवरे, गझलकार श्री.प्रल्हाद सोनवणे, कवी-चित्रकार श्री.प्रमोदकुमार अणेराव, डाॅ.सुरेश खोब्रागडे, डाॅ.नरेश अंबिलकर आणि काही मोजक्याच रसिक स्नेही मंडळींच्या उपस्थितीत रामटेकचे डाॅ.गिरीश सपाटे यांनी माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. (या मुलाखतीचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे.)  >> त्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात मी स्पष्टपणे व ठामपणे सांगितले होते की, "मी अजूनही कोणत्याही विचारवाद वा विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण गेलेलो नाही." आजही माझे ते विचार कायमच आहेत. कारण विचारवाद व/वा विचारसरणी यांना मी अजूनही अंतिम मानू शकलेलो नाही. 'मते कालाच्या पोटात विलय पावतात', असे, ह.ना.आपटे यांचे एक विधान, मी माझ्या माध्यमिक शाळेत सारस्वत पाठमाला या क्रमिक प...

मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर

*मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी, यवतमाळ येथे दि.15 मे 2006 ते 01जून 2008, त्यानंतर गडचिरोली येथे दि.02 जून 2008 ते 24 जून 2010 आणि तदनंतर पुन्हा दि.25 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत यवतमाळ येथेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून डीडीआर या पदावर कार्यरत होतो. 28 फेब्रुवारी 2013 ला मी यवतमाळ येथूनच निवृत्त झालो व माझे जन्मगाव असलेल्या बोरकन्हार (ता.आमगांव, जि.गोंदिया, झाडीपट्टी) येथे पुनर्स्थायी झालो. म्हणजेच मी एकंदरीत सुमारे पाच वर्षे (दोन कार्यकाल) यवतमाळ येथील सपरिवार रहिवासी होतो.  >> माझ्या या यवतमाळ येथील दोन्ही कार्यकाळाची तुलना करता माझ्या एकूणच व्यक्तिमत्त्वात व प्रकृतीस्वास्थ्यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला(?) होता, हे मला दोन्ही कालावधीत जाणणाऱ्या/पाहणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. याचे कारण म्हणजे मी गडचिरोली येथे बदलून गेल्यावर 26 सप्टेंबर 2008 ला माझा एक अपघात होऊन त्यात माझा डावा गुडघा तुटल्याने मला चालताना काठीचा आधार घ्यावा लागत असे. लगेचच 18 जानेवारी 200...

माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका.

माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~         मी माझ्या कवितेतून वैश्विक सत्य सांगत नाही/नसावा. माझ्या पूर्वीच्या कवींनी म्हणे ते सांगितलेच आहे, म्हणून मी पुनरावृत्ती करीत नाही. माझ्या कवितेतून मला जे मांडायचे असते ते वाचकाला इतिहास, वर्तमान व भविष्याचे कालभान देते/द्यावे अशी माझी धारणा/ भूमिका आहे. "तुमचे आमचे सेम असते"- हे निसर्गाधारित नाही, तुमचे आमचे सेम "करावे" लागते. तुमचे आमचे सेम झाल्यावरच जीवनाची खरी गंमत उपभोगता येते, जीवनाची गोडी कळते. त्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतात. हे "प्रयत्न" व्यक्तीला त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्वही देतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे समष्टीत विलीनीकरण कसे करावे हे सुद्धा शिकवतात. घटकत्वाच्या विज्ञानाधारित सिद्धांतानुसार हे पूर्णतः निसर्ग-स्नेही आणि निसर्गसंमत असते.          एखादे गणित सोडविण्याची एकच एक रीत मला माहित असेल तर मी "वैविध्य" या निसर्गाच्या चमत्काराची मजा चाखू शकत नाही/शकणार नाही. गणित सोडविण्याच्या एकाहून अधिक रिती असतात/असू शकतात आणि सगळ्या रितींनी उत्तर "ए...

नशा : कवितेची आणि दारू(?)ची : कटूतेला आवतन

◇नशा : कवितेची आणि दारू(?)ची : कटूतेला आवतन◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          एक वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मी प्रामुख्याने, प्राधान्याने, बेसिकली वगैरे वगैरे एक (उत्तम?) वाचक मात्र आहे. तरी माझ्या हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने मी 1970-72 पासूनच अनुकरण, अनुसरण, प्रतिक्रिया स्वरूप तथाकथित कविता लिहू लागलो होतो. माझा जीवश्चकंठश्च मित्र प्रभाकर पोचलवार याच्यासोबत संयुक्त कवितेचा (म्हणजे कवितेच्या ओळी आलटून पालटून मी व प्रभाकरने लिहिणे) प्रयत्न व प्रयोग सुद्धा आम्ही त्याकाळी केलेला! तर अशी कवितेची ओळख होत गेलेली. याचा पाया मात्र माझ्या बालपणी माझ्या आईने व तिस-या व चौथ्या वर्गात त्यावेळचे माझे वर्गशिक्षक श्री.सिताराम भूराजी चूटे या एकाक्ष सत्य-शिक्षकांनीच रोवला होता.         हायस्कूलच्या व काॅलेजच्या कालावधीत वर्षभर दररोज नियमित 120 सूर्य नमस्कार आणि पारायणे करण्याच्या अटी आणि शपथेवर मला ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोन महान ग्रंथांनी जणू दत्तक घेतले होते. याच कालावधीत योगाचार्य विठ्ठलराल जीभकाटे...

सांस्कृतिक भांडवल व साहित्यिक : एक संक्षिप्त आकलन

*सांस्कृतिक भांडवल व साहित्यिक : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, ------------------------------------- >> सुप्रसिद्ध समीक्षक डाॅ.हरिश्चंद्र थोरात यांनी 2019च्या 'मुक्त शब्द'च्या दिवाळी विशेषांकात, साहित्यिकांच्या/साहित्य लेखनाच्या 'सांस्कृतिक भांडवल' या संकल्पने/संज्ञेबद्दल केलेली मांडणी मला माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार खूपच भावली. कारण मी सुद्धा सुमारे 1975 पासूनच माझ्या "सांस्कृतिक भांडवला"शी तडजोड न करता तथा कोणत्याही तथाकथित परंपरेला आणि विचारवाद/विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण न जाता "इतिहास आढळत नाही" अशा प्रकारचे काही ओबडधोबड व बाळबोध(?) लिखाण करू लागलो आहे.  >> "सांस्कृतिक भांडवल" या संकल्पना/संज्ञेचे नाव किंवा त्याबद्दलची कोणतीही सजग जाणीव मला नसतानाही मी मात्र नैसर्गिक रित्याच या संकल्पनेचा पाईक होतो/आहे, हे मला श्री.हरिश्चंद्र थोरात सरांच्या वर नमूद अप्रतिम मांडणीतूनच कळले. गेल्या चार-पाच पिढ्यात कोणतीही विशिष्ट ऐतिहासिक परंपरा नसलेल्या परिवारातील व क्षेत्रातील माझ्यासारख्या "नव...

माझी आई : सौ.कमलाबाई

*माझी आई : सौ.कमलाबाई* ~~~~~~~~~~~~~~~ >> माझ्या आईचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचेही नाव कमलाबाई. 16 मार्च 1931 ला गोरेगांव तालुक्यातील धुंदाटोला येथे रूपराम पाटील रहांगडाले यांच्या घरी जन्मलेली माझी आई 1942 मध्ये मोहनलाल कटरे यांच्याशी लग्न होऊन बोरकन्हारवासी झाली. गोरेगांव तालुक्यातीलच दवडीपार येथे तिचे चौथीपर्यंत शिक्षण झालेले. मराठी आणि गणितात तिचा विशेष हातखंडा. मलाच नव्हे तर माझ्या सर्वच वर्गमित्रांना आमच्या आठवीपर्यंतचे गणित सोडवण्यात आईने मदत केलेली. कोणतेही गणित चुटकीसरशी सोडवण्यातील तिची गती आम्हाला आश्चर्यचकित करणारीच. नववीपासून आम्हाला इंग्रजी माध्यमातील न्यू मॅथ्स सुरू झाल्यानंतर मात्र आमचा गणितासाठीचा आईच्या मागचा ससेमिरा सुटला.  >> मराठीतील कितीतरी कविता तिला अखेरपर्यंत मुखोद्गत होत्या. त्या कविता ती गाऊन दाखवी. तिला वाचनाचीही खूप आवड होती. तिने आमच्याघरी पांडवप्रताप कथासार, रामविजय कथासार, प्रेमसागर, स्त्री सुबोधिनी सारखी मराठी व हिंदीतील पुस्तके जमवली होती. ही सर्व पुस्तके तिने माझ्या चौथीपर्यंतच माझ्याकडून वाचून घेतली होती. त्यामुळेच मला वाचनाचा जणू भस्...

ग्रंथ माझ्या आयुष्यात...

*ग्रंथ माझ्या आयुष्यात...* ~~~~~~~~~~~~~~ >> माझ्या वडिलांना वाचनाची बिलकुल आवड नसली तरी माझ्या आईला मात्र वाचनाची भयंकर आवड होती. हिंदीतील व मराठीतील धार्मिक ग्रंथ ती नियमित वाचत असे आणि त्यातील कथानके मला माझ्या बालपणी सांगत असे. त्यामुळे मला स्वतः वाचून कथानके समजून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली.  >> माझ्या चौथीच्या वर्गापर्यंत माझे रामविजय कथासार, पांडवप्रताप कथासार, महाभारत, स्त्री-सुबोधिनी, प्रेमसागर, इत्यादी सारखे मराठी/हिंदी ग्रंथ वाचून झाले होते. आणि माझी वाचनभूक वाढू लागली होती. 1965 मध्ये मी पाचवीत गेलो आणि नागपूर तरुण भारत चा नियमित वाचक झालो. त्यावेळी ग.त्र्यं.माडखोलकर हे संपादक होते. त्यांचे संपादकीय व रविवारच्या विविध विषय विभाग या पुरवणीतून मी माझी वाचनभूक भागवत असे. तरुण भारत मधूनच मला महाराष्ट्र टाईम्स ची ओळख झाली. पण आमच्या आमगांव, गोंदिया येथे मटा येत नसल्याने मी नागपूर येथील बर्डीवरील हनुमान गल्लीत स्थित एका न्यूजपेपर एजन्सीला पत्र लिहून रविवारचा मटा मला पोस्टाने मिळू शकेल काय, म्हणून विचारणा केली. आणि आश्चर्य म्हणजे त्या न्यूजपेपर एजन्सीच्या मालकान...

||भयंकर : एक नवाळा* जुना शब्द||

||"भयंकर" : एक नवाळा* जुना शब्द|| ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 1977 मध्ये मी B.Sc.(PCM) झालो. Physics च्या एका प्राध्यापकाच्या कुत्सित, अवकृपेने M.Sc(Phy.) ला प्रवेश मिळण्यापासून फक्त 1 मार्क कमी पडल्याने M.Sc.चा नाद सोडून LL.B.ला प्रवेश घेतला व MPSC/UPSC च्या परीक्षांची तयारी सुरू केली. LL.Bचे वर्ग रात्री लागायचे व दिवसभर MPSC/UPSC च्या अभ्यासाला काही राबावे(?) लागत(?) नव्हते. >> माझा एक मित्र शहीद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल, गोरेगांव (तत्कालीन जिल्हा-भंडारा) येथे Biology चा (विज्ञान) शिक्षक होता. त्यावेळी Maths Teachers ची सगळीकडे अक्षरशः चणचण(?) होती. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना माझ्या मित्राने माझ्याबद्दल सांगितले. मला त्या मुख्याध्यापकांचे बोलावणे आले. मी त्यांना भेटायला गेलो व माझ्या दिनक्रमाची माहिती दिली तथा शिक्षक होण्याची(?) माझी बिलकुल इच्छा नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी सुचवलेला 'तोडगा' (10 ते 5 शाळा, सायं 6 ते 9 लाॅ काॅलेज व उर्वरित वेळ MPSC/UPSC च्या अभ्यासाकरिता!) मला पटला. मी तिथेच जि.प.,मु.का.अ. यांचे नावे अर्ज लिहिला व तो अर्ज मुख्याध्...