Posts

Showing posts from June, 2025

काही गोड, काही कटू वास्तव

*काही गोड, काही कटू वास्तव* *************************          तसा तर माझ्या आईच्या संस्कारामुळे मी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच अवांतर वाचण्यासाठी लालायित असायचो. 1970-71च्या दरम्यान माझ्या वर्गशिक्षिका डाॅ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने माझी ही सवय आणखी दुणावली/तिनावली, वगैरे. 1972-73 पासून मी वाचलेल्या व मला आवडलेल्या पुस्तकाच्या/लेखाच्या/कवितेच्या रचनाकाराचा संपर्क सूत्र मिळवून त्यांना प्रतिसाद पत्रे लिहू लागलो. काही वर्षांनंतर दूरध्वनी ची सोय उपलब्ध झाल्यावर त्याचाही "त्या" साठी वापर करू लागलो. आता चलभाष यंत्र आणि FB/WA/TWITER/TELEGRAM/INSTAGRAM, etc च्या युगात त्या/त्या साधनांचाही "त्या"साठी वापर करू लागलो. माझी मातृभाषा हिंदी(पोवारी) असणे, मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण (गणित वगळता) मराठी माध्यमातून होणे, पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे, त्यामुळे मला तिन्ही माध्यमातील रचनाकार समरसून वाचता/अभ्यासता आले/येतात. (असे मला वाटते!)       या रचनाकारांशी मी वरील साधनांच्या माध्यमातून, माझ्या अल्पबुद्धीच्या प्रतिक्रियेसह, एकतर्फी संपर्कात...

CONSTITUTION OF INDIA AND WE, THE PEOPLE/PUBLIC OF INDIA...

CONSTITUTION OF INDIA AND WE, THE PEOPLE/PUBLIC OF INDIA... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (PLEASE READ CAREFULLY & COMMENT THEN.)       As We all know & Honorable Supreme Court & High Courts also agreed that the PREAMBLE of the CONSTITUTION is the SOUL of our CONSTITUTION & contain the basic structure of our CONSTITUTION, which can not be amended in exercise of the power under article 368 of the Constitution. AND  That PREAMBLE said very firmly that, "WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens :  JUSTICE, ....; LIBERTY .....; EQUALITY ......; .... FRATERNITY ....... .....; .......... do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION."    My inference in the clear light of this MANDATORY provisions of PREAMBLE OF OUR CONSTITUTION is that, "WE, THE PEOPLE  OF INDIA i.e. BHARAT are more SUPREME than all the Co...

गडचिरोली जिल्ह्याचा अवाढव्य विस्तार : एक स्वानुभव

गडचिरोली जिल्ह्याचा अवाढव्य विस्तार : एक स्वानुभव  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       1987 च्या जानेवारी ते डिसेंबर पर्यंत मी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा(देसाईगंज) येथील सीबीएफ (Cattle Breeding Farm) येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व सहकार विषयक एका दोनवर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहकार : संकल्पना व इतिहास, सहकारी कायदा, अंकेक्षण, बँकिंग, लेखापद्धती हे विषय शिकविण्यासाठी डेप्युटेशन वर कार्यरत होतो.         त्यावेळेस माझ्या एक वर्ष वयाच्या मुलाच्या हेमेनजोयमाच्या कठीणतम शस्त्रक्रियेनंतरच्या फाॅलोअप साठी मला दर महिन्यात त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल रुग्णालयात न्यावे लागे. त्यामुळे मी विनंती करून सदरील डेप्युटेशन वरील पोस्ट मागून घेतली होती.         तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अकस्मात बदलले गेल्याने त्यांचा Brain-Child असलेला हा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व सहकार विषयक पदविका अभ्यासक्रम शासनाने बंद केला. पर्यायाने डिसेंबर 1987 मध्ये माझे स्थानांतर अपरिहार्य ठरले.      ...

धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?) with English Translation

*धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          प्राचीनतम भारतीय संस्कृति द्वारा परिभाषित "धर्म" की संकल्पना के अनुसार, कोई भी व्यक्ति किसी भी समय, किसी भी स्थान पर धर्मनिरपेक्ष नहीं हो सकता। पाश्चात्य या गैर-भारतीय धर्मों के दृष्टिकोण से, कोई व्यक्ति धर्म-विरोधी हो सकता है, लेकिन "धर्मनिरपेक्ष" शब्द भारतीय संस्कृति और धर्म की संकल्पना के संदर्भ में पूरी तरह से वदतोव्याघात संज्ञा ही है।       इस शब्द का अर्थतंत्र भारतीय संस्कृति में धर्म की संकल्पना के बारे में अज्ञानता का प्रतीक है। भारतीय संस्कृति में धर्म की संकल्पना के प्रकाश में, यहां तक कि एक कट्टर नास्तिक भी धर्मनिरपेक्ष नहीं हो सकता। इसका कारण यह है कि भारतीय संस्कृति के अनुसार, कोई भी व्यक्ति धर्म के सिद्धांतों और क्रियाकलापों का पालन किए बिना जीवित ही नहीं रह सकता। केवल एक मृत शरीर/शव ही मृत्यु के बाद धर्मनिरपेक्ष हो सकता है। जब तक कोई जीवित है, वह धर्म के अभ्यास और क्रिया से बच नहीं सकता।       न केवल भारतीय बल्कि पश्चिमी दार्शनिक, विचारक और क...

ॲड.लखनसिंह कटरे : एक बहुआयामी व्यक्तिमत्व

*ॲड. लखनसिंह कटरे : एक बहुआयामी व्यक्तिमत्व* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ By ChatGPT        ॲड. लखनसिंह कटरे हे नाव सहकार, प्रशासन, साहित्य, पत्रकारिता आणि ग्रामीण संस्कृतीच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या एका प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. विज्ञान, विधी, शिक्षण, साहित्य, आणि सहकार या विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या उत्तुंग कार्याची छाप पाडली आहे.       ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातील निवृत्त राजपत्रित अधिकारी असून ते जिल्हा सहकार निबंधक (डीडीआर) पदावर कार्यरत होते. प्रशासकीय सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायास प्रारंभ केला असून, सध्या ते सहकार विषयक न्यायिक व न्यायिकवत प्रकरणांमध्ये विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत.        शैक्षणिक दृष्ट्या ते B.Sc.(PCM), LL.B., B.Ed., M.A., H.D.C.M., G.D.C.&A., D.B.M., D.I.T. अशा विविध स्नातक/स्नातकोत्तर पदव्यांनी शिक्षणसंपन्न आहेत, जे त्यांच्या बहुआयामी क्षमतेचे व प्रतिभेचे द्योतक आहे.         साहित्य, संस्कृती आणि बोलीभाषा संवर्धन या क्षेत्रांमध्येही त्यां...

*उजाखो*त्तर वास्तव (?)*

*उजाखो*त्तर वास्तव (?)* ~~~~~~~~~~~~~~         एमपीएससीच्या प्रतियोगिता परीक्षेची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून मी मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार विभागात तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था या राजपत्रित तालुका प्रमुख पदावर रुजू झालो. नियमित पदोन्नतीसाठी (आमच्या संपूर्ण बॅचला) मा.सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिल्यावर 19-20 वर्षांनंतर माझ्यासहित आमच्या बॅचच्या अधिकाऱ्यांना प्रथम पदोन्नती मिळू शकली.       पदोन्नतीनंतर मी, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात (विभागाच्या शिर्षात तोवर बदल झाला होता) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या राजपत्रित जिल्हा प्रमुख पदावर मार्च 2003 मध्ये रुजू झालो. आणि अखेर 10 वर्षानंतर फेब्रुवारी-2013 ला नियत वयोमानानुसार त्याच प्रथम पदोन्नत पदावर निवृत्त झालो.       माझ्या एकूण सुमारे तीस/30 वर्षांच्या शासकीय राजपत्रित सेवेत मला सुमारे चोवीस/24 वर्ष आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित अशा तालुक्यात/जिल्ह्यात तालुका/जिल्हा प्रमुख म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. या 24 ...

नक्षलवाद व सहकार : काही निरीक्षणे (प्रकाशित)

*नक्षलवाद व सहकार : काही निरीक्षणे* (प्रकाशित) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~~       मी चंद्रपूरचा जिल्हा उपनिबंधक म्हणून प्रभार मार्च 2003 मध्ये घेतला. तेथे काम करताना मला नक्षल चळवळीच्या गडचिरोली-चंद्रपूर येथील वेगळ्या वैशिष्ट्य-रूपाचे आकलन झाले. त्यापूर्वी सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगांव, देवरी, अर्जुनी-मोरगांव व सडक अर्जुनी आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली तथा नागपूर जिल्ह्यातील रामटेक या तालुक्यांत मी तालुका सहायक निबंधक म्हणून काम केले असल्याने या तालुक्यांतील तत्कालीन नक्षल चळवळीचा मला जवळून परिचय होताच.        गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक जून-2004 मध्ये निवृत्त झाले. पण त्यांची जागा घेण्यास महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा उपनिबंधक तयार नव्हता, शासन सुद्धा ते पद भरण्याबाबत अनुत्सुकच होते. त्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त प्रभार मजवर सोपवण्यात आला. मी चंद्रपूर जिल्ह्याचे कामकाज सांभाळून दर आठवड्याला मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस गडचिरोलीच्या कामासाठी राखून ठेवले होते. तेव्हा मला गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ व जिल्ह...

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान : ॲड.लखनसिंह कटरे

*मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> जून-जुलै 1977 मध्ये मी बी.एससी.(पीसीएम) उत्तीर्ण झालो. त्यावेळी मला पुण्याच्या तत्कालीन अनिरुद्ध प्रकाशनाचे गजानन क्षीरसागर द्वारे संपादित जिज्ञासा या मासिकातून एमपीएससी, युपीएससी बद्दल तथा त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रतियोगिता परीक्षा व त्याद्वारे भरली जाणारी शासकीय(!) पदे याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली होतीच. त्यानुसार मी त्या परीक्षांची तयारी करीत असताना मला कळले(?) की एमपीएससी, युपीएससी च्या परीक्षांकरिता आपल्या विज्ञान-स्नातकीय अभ्यासक्रमातील विषयांपेक्षा आर्ट्स विभागातील विषय निवडणे सुलभ-सोपे व अंतिम निवडीसाठी फायद्याचे(!) ठरते. त्या सल्ल्यानुसार मी इतिहास, समाजशास्त्र, मराठी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, विधी अशा विषयांची निवड केली.  >> समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना 'मनुष्य हा समाजशील/सामाजिक प्राणी आहे', Man is a social animal, ही अतिशय आवडणारी संकल्पना मला प्रथमच भेटली(!)....

जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन (New)

*जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन* (New) (प्रकाशित : दऊत लेखणी : मे-जून-जुलै 2025) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र(विदर्भ), राजस्थान(अंशतः) या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पंवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर व भ्रामक समज/अपसमज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच बोलीभाषा असून तिला पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही मुख्यतः ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्ध/मौखिकच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध/लिखित करण्याचे जोरशोराचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दि.04 ऑक्टोबर 2018 ला पोवारी बोलीच्या इतिहासात सर्वप्रथमच यासंदर्भात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, मी (ॲड.लखनसिंह कटरे) आणि ॲड.देवेन्द्र चौधरी या त्रयींच्या आग्रही व विनम्र पुढाकाराने तथा पोवार समाजातील अन्य मान्यवरांच्या सुखद सहभागी आशीर्वादाने ही पोवारी बोली, साहित्य क्षेत्रात यावी, या बोलीत विविध प्रकारचे साहित्य निर्माण व्हावे, यासाठी सफल प्रयत्नाची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली. या प्रारंभिक बी...