Posts

Showing posts from June, 2022

ओनामासी ढमऽऽऽ.........

*"ओनामासी ढमऽऽऽ........"* ~~~~~~~~~~~~~~~~       □आमच्या झाडीपट्टीमंधी मच्छीमार/कोळी समाजालं ढीवर समाज मुहून ओरखतंत.         तं झाला असा, आमच्या लहानपनी आमच्याकर फंदूभाऊ भूमके नावाचा एक ढीवर समाजाचा अतिशय हसमुख, मेहनती, इमानदार व मजाकी नवकर होता.         मी पैली-दुसरीत असीन, तवाची बात होय. फंदूभाऊना मालं सितकारामंधी धगाळी सेकावाच्या भारी सकारीसकारीच इचारलंन का, ''तुमालं इस्कोलात का सिकवतंत?''  मी मनलू ''अ, आ, इ, ई, अना १, २, ३, ४,... सिकवतंत.''          तं फंदूभाऊ मने, ''तुमालं "ओनामासी ढमऽऽऽ, नवरा बायको होऊऽऽऽन" असा नाही सिकवत का? माझा घर इस्कोलाजवरच आहे तं मी गुरूजीलं असा सिकवताना आयकलूहू..." माझी हसता हसता पूरेवाटच झाली. फंदूभाऊ बी हासू लागला.          आता फंदूभाऊ नसे, वयोमानाना गेला बिचारा कहीचाच! पर माझ्या डोसक्यातना "ओनामासी....." काही निंघतच नोहोता.        माझ्या ९वी, १०वी, ११वी मंधी, आदर्श विद्यालय आमगांवात एक नवाच इषय, संस्कृत, आमालं त...

मी एक अनबुझ "हिंदू"...... !(?)

*मी एक अनबुझ "हिंदू".......!(?)* ~~~~~~~~~~~~~~~~~~ 1)1979 मध्ये मी देवरी (तत्कालीन जि.भंडारा) येथील जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे गणित शिक्षक म्हणून बदलून गेलो. तेथे देव गुरूजींच्या परिवाराशी असा काही जुळलो की, त्यांची कन्या माझी मानसकन्या झाली.(आम्ही आजही हे नाते निभावून आहोत.) देव वहिनी माझ्या मानसआई व देव गुरूजी माझे मानसभाऊ झालेत. त्यांच्या दोघांच्या शेवटपर्यंत हे नाते त्यांनी निभावले. त्यांच्या घरी कोणतेही सोवळे-ओवळे, जात-पात असा प्रकार कधीच पाळल्याचे मी किंवा कोणीही पाहिले नाही, अनुभवले नाही. देववहिनी म्हणजे मानवी-देवीच होत्या. त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही, केव्हाही त्यांच्या स्वैंपाक घरात "घूसून" जेवण करू शकत होता.  2)2003 मध्ये माझ्या पत्नीची गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी दुसरी मानसकन्या, जी पूर्वाश्रमी(?)ची अ.जा.समाजातील व सध्या बौद्ध धम्मीय, नोकरीतून महिनाभराची सुट्टी घेऊन माझ्या कडे राहिली व तिने संपूर्ण घर (माझ्या मुला-मुलींच्यादेखभालीसह) सांभाळले. माझ्या पत्नीच्या वतीने ती "देवपूजा"ही करायची. तिच्या ...

सामाजिक आदिमत्व : एक आकलन/टिपण

*सामाजिक आदिमत्व : एक आकलन/टिपण* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> पृथ्वीची उत्पत्ती 46 कोटी वर्षांपूर्वी झाली असे सांगितले जाते. त्यावेळेस पृथ्वीवर आकाश, वातावरण, जमीन असले काही फरक नव्हते. त्यावेळेस पृथ्वी म्हणजे एक धूसर आणि अती तप्त असा गोळा होता. जसजशी पृथ्वी थंड होऊ लागली, तसतसे तेथे वातावरणनिर्मिती होऊ लागली, असेही याविषयातील शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष प्रतिपादित करतात.  >> अशा या पृथ्वीवर मानवी जीवनाचा प्रारंभ साधारणतः साडेतीन कोटी वर्षांपूर्वी झाला असावा असाही अंदाज वर्तवला जातो. असा तो आदिम मानव ते आजचा मानव ह्या अतिशय कठीणतम प्रवासाची हकिकत आम्ही कमोबेस जाणून असलो तरी त्यातून आम्ही किती शिकलो, किती धडे घेतले, हा लाखमोलाचा प्रश्न आम्हाला अजूनही पूर्णत्वाने सोडवता आलेला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या कठीणतम प्रवासातील मानवी मनाच्या प्रबोधनात्मक संवेगाची भूमिका आम्ही विसरत तर चाललो नाही ना, अशी शंका आजही पदोपदी उद्भवते. सामाजिक आदिमत्वाचे शरणार्थी अजूनही या मानवी मनाच्या प्रबोधनात्मक संवेगाला पेलू शकत नसल्याचे आढळून येते. अशा अशक्त व अनगढ समाजमन धारकांची संख्या को...

नावात काय आहे?

*नावात काय आहे?* ~~~~~~~~~~~~ >> माझ्या शालेय जीवनातील (1969-1972) एक आठवण अशी की, आपले नाव लिहिताना आडनाव/सरनेम लिहू नये, कारण त्यामुळे जात कळते, असे समजल्याने मी माझ्या शालेय जीवनापासूनच कधीकधी माझे नाव के.लखनसिंह असेच लिहित असे. ललित, गीतादर्शन, पुरुषार्थ, धर्मभास्कर, पंचधारा, प्रज्ञालोक, कविता-रती, अनुष्टुभ या मासिकांचा वर्गणीदार होताना सुरुवातीला मी के.लखनसिंह हेच नाव वापरत(?) असे. >> सुमारे 35-40 वर्षांपूर्वी आपापले नाव कसे लिहावे, याबद्दल एक चळवळ(?) उभारण्यात आली होती. त्यानुसार प्रथम आईचे नाव, मध्यभागी वडिलांचे नाव व शेवटी आपले नाव लिहावे अशी ती टूम(?) होती. मी त्याबरहुकुम माझे नाव लिहायला सुरुवात सुद्धा केली होती. त्यानुसार माझे नाव के.एम.लखनसिंह/के.एम.लक्ष्मणाराव (के.एम.= कमलाबाई मोहनलाल) असे व्हायचे. हे नाव मी काही वर्षे वापरले(?) सुद्धा. (माझ्या कार्यालयीन चेम्बरवर बहुधा हेच नाव असायचे!) >> याच धर्तीवर पण जरा वेगळे, म्हणजे प्रथम आपले नाव, मध्यभागी आईचे नाव व शेवटी वडिलांचे नाव, अशी सुद्धा पद्धत विकसित(!) झाली. त्यानुसार माझे दोन वरीष्ठ मित्रश्रेष्ठ त्यांची...

शेती आणि शेतकरी : एक आकलन असेही

शेती आणि शेतकरी : एक आकलन असेही ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~           माझ्या गेल्या कित्येक पिढ्या शेती आणि शेतीची मशागत/नोकरी(?) करण्यातच मशगूल होत्या. (माझ्या वयाच्या 22-23 वर्षापर्यंत मी सुद्धा छोटे-मोठे शेतीकाम केले आहे.) शासकीय नोकरीत जाणारा मी कुटूंबातील पहिलाच. माझा मुलगा B.Com.; LL.B.; M.B.A.(Fin.&HR); S.A.P. असूनही तो मात्र शेती करतोय.(त्यानेही काही काळ जाॅब केलाय.) तर सांगायचा उद्देश असा की, मला शेती आणि शेतकरी याबद्दल बोलायचा अधिकार(??) आहे असे मला वाटते.      2014 मधील अचाट आणि अफाट सत्ताबदल कसा काय होऊ शकला, याबद्दल मोठमोठ्या विद्वानांनी व मीमांसकांनी लाखो पाने भरतील अशा कारणमीमांसा दिलेल्या आहेत. माझ्या अल्पबुद्धीला त्यापैकी कोणतीही कारणमीमांसा 100% पटत नाही.(माझे अज्ञान म्हणा किंवा दुर्दैव!) 1947 नंतरच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांना लुबाडणे हा मुख्य एजेंडा कधीही सोडलेला नव्हता. याला वाजपेयी सरकार सुद्धा मला अपवाद वाटत नाही.(अपवाद फक्त शास्त्री सरकार). "शेतकरी" ही "शिवी" ठरू लागली होती. सिलिंगचा कायदा, शेतक-याला बेइज्जत करून राबविलेला ...

ओबीसी (चळवळ) आणि किसानोत्थान चळवळ : एक संक्षिप्त आकलन

*ओबीसी (चळवळ) आणि किसानोत्थान चळवळ : एक संक्षिप्त आकलन*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      ओबीसी प्रवर्गामध्ये मोडणारी भारतीय जनसंख्या/लोकसंख्या मागील कित्येक(?) दशके मोजलीच जात नसली तरी ती एकूण भारतीय/इंडियन लोकसंख्येच्या साठ(60)% पेक्षा कमी नसावी, असा साधार कयास मांडला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येच्या कोणत्याही विधीमान्य, सामाजिक-न्यायमान्य, न्यायोचित, ... मागण्या मात्र आजवरच्या कोणत्याही "इंडियन" शासन व्यवस्थेने अजूनतरी गंभीरपणे, सकारात्मक रित्या विचारात सुद्धा घेतलेल्या नाहीत, ही #कटू-वस्तुस्थिती (#BitterReality) आहे.          मात्र असे कां घडले/घडत असावे? हा महाभयंकर प्रश्न सुद्धा अनुत्तरितच आहे.         माझे अल्पबुद्धीचे आकलन असे आहे की, आम्हा ओबीसी चळवळीतील धुरीणांना शाहू, फुले, आंबेडकर, कांशीराम,... काही पेलवता/उलगडवता आले/येत नाहीत, आणि त्यामुळे विचारधारा, मार्गक्रमण, व्यूहरचना, ... या बाबी सुस्पष्ट असूनही आम्ही अजूनही फक्त चाचपडतच आहोत. या संदर्भात एक सत्य-घटना काहीशी आठवते ती अशी, ---- >...

मी आणि माझी मराठी

*मी आणि माझी मराठी* ~~~~~~~~~~~~~ >> मार्च-एप्रिल 1972 च्या तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक परीक्षेचा निकाल जून-1972 मध्ये लागला. तेव्हा तरुण भारत मध्ये आमच्या नावासहित (उदा. ल.मो.कटरे) निकाल छापून आला होता, हे आज खरेही वाटणार नाही. मी वर्गात पहिला येऊन उच्च प्रथम श्रेणीत (मराठी-संस्कृत मध्ये प्रावीण्यासह) उत्तीर्ण झालो. आणि पुढच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील धोटे बंधू सायंस काॅलेज मध्ये बी.एससी.(पीसीएम) च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. गोंदिया येथील टी.बी.टोलीच्या तळवेकर या एका सहृदय अशा टपरी हाॅटेल चालकाच्या घरी भाड्याने रूम(?) घेतली. मी आणि माझा भाचा हेमंतकुमार असे दोघेही आम्ही एकत्रच राहायचो. आमच्या सेवे(?)करिता माझ्या वडिलांनी नोकराची सोय(?) उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला लोंढू आणि नंतर बकाराम हा आमच्या सेवेत(?) होता. >> मॅट्रीक पर्यंत मी आपल्या सवंगड्यांसोबत, वर्गमित्रांसोबत कोणत्या भाषेत बोलायचो हे नीटसे आठवत नसले तरी पहिलीपासूनचा वर्गमित्र बिरेन्द्रसोबत मी हिंदीतच बोलत असल्याने त्यावेळेस माझी बोलचालीची सर्वसाधारण भाषा हिंदीच राहिली असावी असे वाटते. मराठी माध्यमातून...

मराठवाडा, मी आणि मराठी

□मराठवाडा, मी आणि मराठी□ ~~~~~~~~~~~~~~~~~    MPSC द्वारे माझी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात (तत्कालीन कृषी व सहकार विभागात) तालुका सहायक निबंधक म्हणून निवड झाल्यानुसार मी दि.05 मे 1984 ला त्या विभागात रुजू झालो. सुरूवातीचा दोन वर्षाचा परिविक्षा (PROBATION) कालावधी संपल्यानंतर मला प्रथम नियुक्ती मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुकास्थळी, तालुका प्रमुख म्हणून, मिळाली.        मला सांगण्यात आले होते की, महाराष्ट्रात सर्वात मागास विभाग म्हणजे मराठवाडा विभाग -- या विभागात सर्वात मागास जिल्हा म्हणजे बीड जिल्हा -- आणि बीड जिल्ह्यातील सर्वात मागास तालुका म्हणजे पाटोदा तालुका ! तरी "न घाबरता(?)" मी दि.07 मे 1986 ला पाटोदा येथे रूजू झालो. (त्यावेळी फक्त सहा महिन्याचा असलेल्या माझ्या मुलाची, अनिकेतसिंह ची, HEMENJOYMA ची, कानाखाली गालावर, एक मोठी शस्त्रक्रिया (25 टाके) नागपूर च्या GMC मध्ये नुकतीच झाली होती व त्याला दर पंधरवड्याला FOLLO-UP साठी तेथे (नागपूर ला) न्यावे लागे. म्हणून मी हिंमत करून एकटाच पाटोद्याला पोचलो होतो.)   ...

मला पडलेला एक "गहनतम"(?) प्रश्न...(???)

मला पडलेला एक "गहनतम"(?) प्रश्न...(???) ************************************       नंदा खरे यांनी त्यांच्या लेखनात वापरलेले मार्सेल नावाच्या शेतक-याचे उद्गार... 'माझे मुलगे शेतावर काम करू इच्छित नाहीत. त्यांना कामांचे ठराविक तास, शनिवार-रविवार आणि इतर सुट्या असं हवं असतं. त्यांना खिशात पैसे हवे असतात खर्चायला. ते पैसे कमवायला गेले आहेत आणि पैशांबाबत पागल आहेत. मला वाटतं की ते चुकताहेत. दिवसभर काही तरी विकत राहणं, आठवड्याला 45 तास कारखान्यात काम करणं, हे माणसाचं आयुष्य नाही. त्याने माणसे अडाणी होतात. ते पुन्हा शेतावर येणार नाहीत. शेत अखेर निकोलला (त्याची पत्नी) आणि मलाच करायचे आहे. जे मरू घातले आहे त्यावर एवढे काम का करायचे? तर माझे उत्तर आहे : काम करणे म्हणजे ज्ञान टिकवून ठेवणे आहे. माझी मुलं हे गमावताहेत. मी खड्डे खोदतो, योग्य ऋतूत रोपे लावतो, हे माझ्या मुलांसाठी उदाहरण आहे, जर त्यांना ते पाहायचे असेल तर. नाही तर ते माझ्या वडलांना, त्यांच्या वडलांना सांगणे आहे की त्यांनी मला दिलेले ज्ञान मी टाकून दिले नाही आहे. त्या ज्ञानाशिवाय मी काहीच नाही.'      "शेतक-य...

सत्याग्रही विचारधारा, डाॅ.कुमार सप्तर्षी आणि मी : एक पत्रव्यवहार

प्रेषक :-  @ॲड.लखनसिंह कटरे,  बोरकन्हार-441902, ता.आमगांव  जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र) चलभाष : 8208557164, व्हाॅट्सॲप : 9665041483, ईमेल : lskatre55@gmail.com  दि.02.06.2022 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रति,  डाॅ.कुमार सप्तर्षी  संपादक, सत्याग्रही विचारधारा,  पुणे-411038. सप्रेम सादर नमस्कार.  >> कृपया, सोबत संलग्न असलेल्या माझ्या दि.07.04.2022 च्या पत्राचे अवलोकन व वाचन करावे ही सविनय विनंती आहे. >> यासोबत पुनश्च सविनय कळवितो की, ज्या नियतकालिकाचे संपादक, प्रकाशक, व्यवस्थापक हे त्या नियतकालिकाच्या वर्गणीदार-वाचकांच्या पत्रांची साधी दखल सुद्धा घेत नाहीत, ते स्वतःला गुरुस्थानी व वर्गणीदार-वाचकांना त्यांच्या पायाशी बसणाऱ्या शिष्यस्थानी समजतात, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. अशा नियतकालिकाशी मी पुढील संबंध ठेवू शकत नाही, ही माझी कमजोरी आहे, कारण मला कोणाचेही शिष्यत्व मान्य नसून मी फक्त मित्रत्वाचा भोक्ता आहे. >> त्यानुसार मी दि.07.04.2022 च्या माझ्या पत्रात हे स्पष्टपणे कळवूनही आपण मला सविधा चा मे 2022 व जून 2022 चा सुद्धा अंक जबरदस्त...

मराठी साहित्य/विचारविश्वातील नकारात्मकता : एक कटू निरीक्षण

*मराठी साहित्य/विचारविश्वातील नकारात्मकता : एक कटू निरीक्षण*  ----> @ॲड.लखनसिंह कटरे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> नकारात्मक* बाबी, नकारात्मक वस्तुस्थिती, साऱ्याच नकारात्मक गोष्टींचे (वांझ?) उदात्तीकरण करणे म्हणजेच आजचे उत्कृष्ट ते उत्कृष्टतम मराठी साहित्य (कविता, कथा, लेख, नाटक, कादंबरी) होय, असेच विचार मांडणे म्हणजे उत्कृष्टतम वैचारिकता होय, असे सध्या मराठीतील साहित्य व वैचारिक क्षेत्रात मानले जात असल्याचे बहुतेक सर्वत्र आढळू लागले आहे. (सन्माननीय अपवाद अवश्य आहेत. पण त्यांचे प्रमाण किती, हा खतरनाक प्रश्न आहे.) >> जीवनातील सकारात्मक* बाबींतून, सकारात्मक वस्तुस्थितीतूनही काही उत्कृष्ट साहित्य प्रसवले जाऊ शकते, उत्कृष्ट विचार मांडले जाऊ शकतात, ही गोष्ट सध्या मराठी साहित्य व वैचारिक क्षेत्रातून कालबाह्य ठरवली गेली आहे की काय, अशी साधार शंका यावी असे मराठीतील साहित्यिक/वैचारिक वातावरण(!) आढळून येऊ लागले आहे. आज एखादी व्यक्ती जेवढे जास्त नकारात्मक बाबींचे उदात्तीकरण करेल तेवढे त्याचे साहित्य व वैचारिक क्षेत्रातील उच्च(!) स्थान ठरविण्याची जणू अहमहमिकाच सुरू आहे की का...

भवभूति : झाडीपट्टीतील एक दुर्लक्षित महाकवी/नाटककार

बोरकन्हार-441902, दि.05/02/2022 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ शतक महोत्सवी विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या मा.अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्यांना नम्र विनंती-वजा-आवाहन  =========================== *भवभूति : (झाडीपट्टीतील) एक दुर्लक्षित महाकवी/नाटककार*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या (तीन तिगाडा) सीमाक्षेत्रात वसलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास-प्रसिद्ध आमगांव तालुक्यातील पदमपूर (पद्मपूर) येथे होऊन गेलेला भवभूति हा महाकवी/नाटककार अजूनही जरा दुर्लक्षितच आहे/राहिलाय. (म.म.वा.वि.मिराशी यांनी भवभूति यांचे (पदमपूर) हे स्थान संशोधनानंतर सिद्ध केले आहे. आजही पदमपूरच्या परिसरात दोन-तीन ठिकाणी तत्कालीन खुल्या नाट्यमंचाचे भग्नावशेष, दगडी खांब वगैरे, पाहता येतात. ) >> राजदरबारापुरती मर्यादित असलेली तत्कालीन नाट्यकला खऱ्या स्वरूपात बहुजनांसाठी मोकळी करणारा, खुले रंगमंच या आधुनिक संकल्पनेचे कदाचित मूळ ठरावे अशा खुल्या दगडी खांबाच्या कायम नाट्य सभामंडपाचे (स्टेज चे) आविष्कार(!) करणारा भ...