Posts

Showing posts from October, 2023

प्रशासन की सुशासन : एक संक्षिप्त टिपण (प्रकाशित)

*प्रशासन की सुशासन : एक संक्षिप्त टिपण* (प्रकाशित) ------------------------------------------------------------------- ( Whether Administration or Governance?) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~       मी 1978 ते 2013 पर्यंत एकूण साडे चौतीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत [जिल्हा परिषदेच्या शिक्षण(शिक्षक) विभागात वर्ग 3 ते MPSC द्वारे निवड होऊन महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वर्ग-2 ते वरीष्ठ वर्ग-1 (जिल्हा प्रमुख) पदांवर] यशस्वीपणे(?) कार्य केले असून, 2013 ला निवृत्त होऊन, वडिलोपार्जित शेती साांभाळण्यासाठी, माझ्या छोट्याशा (पैतृक) खेडेगावात स्थायिक झालो आहे.           'वस्तुतः प्रशासन-शास्त्राचे (किंवा मानव्य शाखेतील बहुतेक शास्त्रांचे सुद्धा) बहुतेक सिद्धांत हे अनेक/विविधांगी बाबी गृहीत धरून मांडलेले असतात, त्यामुळे बहुतांश वेळा ते व्यामिश्र वास्तवतेच्या जवळ जाणारे असतातच असे नाही. मात्र काही बाबी/सिद्धांत हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने ते वास्तवतेच्या तथा व्यावहारिकतेच्या जवळ असण...

गायत्री परिवार, चार वेद व मी : एक चौमिती अनुबंध

*गायत्री परिवार, चार वेद व मी : एक चौमिती अनुबंध* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          माझे आजोबा स्व.उकनजी पाटील कटरे. त्यांच्या पहिल्या पत्नीला दोन मुली झाल्यावर अकस्मात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. माझ्या आजोबाचे आईवडील त्यापूर्वीच निधन पावले होते. त्यामुळे आमच्या वाड्यात माझे आजोबा व त्या दोन अजाण मुली असे तिघेच उरले. खाण्यापिण्याची, स्वैंपाकाची गंभीर समस्या उद्भवली. बाजूच्या वाड्यातील माझ्या आजोबांच्या चुलतभावाचा परिवार अडीअडचणीला मदत अवश्य करायचे. पण ते या गंभीर समस्येचे कायम समाधान नव्हतेच. अखेर माझ्या आजोबांनी दुसरे लग्न केले. या लग्नाद्वारे त्यांना चार अपत्ये झाली. एक पुत्र व तीन पुत्री. त्यातील माझे वडील मोहनलाल कटरे हे मोठे व तिन्ही बहिणी लहान. अशा मला पाच आत्या होत्या. त्यापैकी चार आत्या निवर्तल्या असून वडीलांच्या पाठची दुसरी आत्या पण चौथे स्त्री अपत्य असल्याने चौथी आत्या सध्या असून तीचे वय 89 वर्षे आहे. परवा तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा माझ्या स्मृतीपटलावरील एक *त्रिमीत* अनुबंध पुनर्जागृत झाला.        झाले असे की, माझी ही चौथी आ...

असहमति और संवाद की परंपरा : एक आकलन (उद्घृत)

*असहमति और संवाद की परंपरा : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      कहा जाता है कि सत्य हर जगह से थक-हारकर अंततः साहित्य में आश्रय लेता है। क्योंकि सत्य को असहमति के कई टोंकदार काटों एवं कंकरों से गुजरकर ही अपना अस्तित्व बनाना होता है। इसीलिए असहमति की शुरुआत मानवता की यात्रा के साथ हुई यह माना जाता है। मानवता की यात्रा और सत्य का उद्भव परस्परावलंबी होने का अनैतिहासिक इतिहास सभ्यताओं के इतिहास के साथ-साथ परिलक्षित होता है। असंतोष, असहमति और प्रतिवाद के कठीण परीक्षणोंसे गुजर कर ही सत्य की खोज संपन्न होती है। इसीलिए धर्म, सभ्यताएं, दुनिया की महान साहित्य कृतियां यह सब असहमति की देन मानी जाती है। वेद-वेदांत के रचनाकार, बुद्ध, रामानुज, गोरखनाथ, रामानंद, वल्लभ, कबीर, गांधी, प्रेमचंद जैसे व्यक्ति असहमति की भूमि पर खड़े होकर ही कुछ मूल्यवान दे सके थे। इतना ही नहीं, भारत का संविधान भी सामंती-औपनिवेशिक धारणाओं से असहमति की बुनियाद पर निर्मित हुआ और इसके भीतर से लोगों ने ('हम भारत के लोगों' ने) नए भारत का स्वप्न देखा। इससे यह स्पष्ट हो जाता है कि, मानव-समाज में असहमति का होना और ...