Posts

Showing posts from May, 2021

एक आलतू-फालतू CONFESSION

◇एक आलतू-फालतू CONFESSION◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ □रामदास स्वामी यांनी "दासबोधा"त मुर्खांची काही लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी "स्वतःची तारीफ स्वतः करतो, तो एक मुर्ख" या आशयाचेही एक लक्षण आहेच. मी तसाच काही एक मुर्खपणा करू इच्छितो. त्याबद्दल क्षमस्व. >> मी 1981 मध्ये तत्कालीन नागपूर विद्यापीठातून LL.B. ची परीक्षा विद्यापीठात Merit THIRD राहून उत्तीर्ण केली. त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे LL.B. चे पेपर्स तपासण्यासाठी तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश अशा परप्रांतात पाठविण्यात येत असत, हे महत्त्वाचे(!). मी Merit THIRD असल्याने मला LL.M. करिता UGC ची स्काॅलरशीप ऑफर झाली होती. पण मला LL.M. करण्याची इच्छाच नसल्याने मी ती नाकारली व B.Ed. केलं. परंतु 1979 पासून मी Mh.L.J. चा नियमित वर्गणीदार व वाचक मात्र राहिलो. शिवाय Service Cases Today, C.T.J., APS LABOUR DIGEST, विधी समाचार, न्यायबोध, Consumer Cases Today, VOICE, आदि विधीविषयक नियतकालिकांचाही वर्गणीदार व वाचक राहिलोय. त्यामुळे मला माझ्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या Quasi-Judicial कामकाजात व निर्णय/आदेश पारित क...

एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)

*एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~        1965 मध्ये मी दहा वर्षाचा असतानापासूूनच मला ग.त्र्यं.माडखोलकरांच्या संपादकत्वाखालील नागपूर "तरुण भारत" नियमित वाचण्याची सवय लागली होती. रविवारची पुरवणी व दिवाळी विशेषांक वाचून मला मराठी वाचनाचा नादच लागला. त्यापूर्वी आईच्या पुढाकाराने मी हिंदी धार्मिक ग्रंथ (रामायण, महाभारत, स्त्री-सुबोधिनी, ... आदि) वाचले होते. पण मराठी वाचनाची सवय मात्र "तरुण भारत" ने च लावली. रविवारच्या तरुण भारतात विविध नियतकालिकांच्या जाहिराती प्रकाशित व्हायच्या. अशाच एका जाहिरातीनुसार मी 1968 मध्ये "ललित" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. 1969 मध्ये पुण्याच्या गीता धर्म मंडळाच्या "गीतादर्शन" मासिकाचा आणि 1970 मध्ये मुंबईच्या अवधूत शास्त्री यांच्या "धर्मभास्कर" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. त्यानंतर 1980 पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे द्वारे प्रकाशित "महाराष्ट्र साहित्य पत्रिका", मराठी संशोधन मंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित "भाषा संशोधन पत्रिका", नागपूरच्या डाॅ.ब.स.येरकुंटवार यांचे ...

नशा : कवितेची आणि दारूची(?) : कटूतेला आवतन

◇नशा : कवितेची आणि दारूची(?) : कटूतेला आवतन◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          एक वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मी प्रामुख्याने, प्राधान्याने, बेसिकली वगैरे वगैरे एक (उत्तम?) वाचक मात्र आहे. तरी माझ्या हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने मी 1970-72 पासूनच अनुकरण, अनुसरण, प्रतिक्रिया स्वरूप तथाकथित कविता लिहू लागलो होतो. माझा जीवश्चकंठश्च मित्र प्रभाकर पोचलवार याच्यासोबत संयुक्त कवितेचा (म्हणजे कवितेच्या ओळी आलटून पालटून मी व प्रभाकरने लिहिणे) प्रयत्न व प्रयोग सुद्धा आम्ही त्याकाळी केलेला! तर अशी कवितेची ओळख होत गेलेली. याचा पाया मात्र माझ्या बालपणी माझ्या आईने व तिस-या व चौथ्या वर्गात त्यावेळचे माझे वर्गशिक्षक श्री.सिताराम भूराजी चूटे या एकाक्ष सत्य-शिक्षकांनीच रोवला होता.         हायस्कूलच्या व काॅलेजच्या कालावधीत वर्षभर दररोज नियमित 120 सूर्य नमस्कार आणि  पारायणे करण्याच्या अटी आणि शपथेवर मला ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोन महान ग्रंथांनी जणू दत्तक घेतले होते. याच कालावधीत योगाचार्य विठ्ठलराल जी...

तुझी गोधडी चांगली... वाचून (गिरीश कुबेर यांना पत्र)

बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया  (विदर्भ/झाडीपट्टी-महाराष्ट्र), दि.10.05.2021 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रति, मा.श्री.गिरीश कुबेर  संपादक, लोकसत्ता.  सप्रेम सादर नमस्कार.  >> पुनश्च सविनय कळवितो की, मी लोकसत्ता चा सुमारे 25-30 वर्षांपासूनचा नियमित वाचक आहे. सध्या निवृत्तीनंतर मी माझ्या पैतृक खेडेगावी स्थायिक झालो असून माझ्या गावात लोकसत्ता चे अंक रोजच्या रोज मिळत नसले तरी एक-दोन दिवसानंतर मला लोकसत्ता चे अंक मिळतील अशी व्यवस्था मी केली आहे. त्याप्रमाणे दि.08 व 09 मे चे दोन्ही अंक आज दि.10.05.2021ला मिळाले.  >> काल दि.09.05.2021 च्या लोकरंग मधील आपला अतिशय महत्त्वाचा व वस्तुस्थितीचे सुस्पष्ट विश्लेषण असलेला लेख "तुझी गोधडी चांगली..." मला खूप खूप आवडला. आपण या 'गागर में सागर' ठरणा-या लेखात मांडलेले विचार आणि त्याच्या कारणमीमांसेचे आपण केलेले विश्लेषण म्हणजे भारतीय जनमानसाच्या inbuilt विवेकशीलतेचे आपले अगदी सुयोग्य आकलन असून मी आपल्या या आकलनाशी माझी पूर्णपणे सहमती व्यक्त करतो. (माझी अशी सहमती म्हणजे माझी शेखी नसून आपल्या या संदर्भातील विविध ल...

आदिम प्रकाशचित्रे : एका अगम्य इतिहासाची फलश्रुती?

◇आदिम प्रकाशचित्रे◇     ---------------------------     (एका अगम्य इतिहासाची फलश्रुती?)  ---------------------------------------------            आज दि.29 मार्च 2021, होळीचा दुसरा म्हणजे धुुळवडीचा दिवस. मार्च 2018 च्या अशाच होळीच्या दिवशीची एक आठवण ताजी झाली. त्यादिवशी पहाटे पाच वाजताच मला दचकून जाग आली होती. 1996-97 मध्ये माझ्यासोबत घडलेल्या अनैतिहासिक घटना व प्रसंगांचा थयथयाट अचानक माझ्या झोपलेल्या स्मृतीतून प्रकट झाला होता. विस्मरणाची कला अभ्यासली(?) असली तरी त्याकाळातील एकेक प्रसंग चलचित्राप्रमाणे माझ्या मानसपटलावरून सरकू(!) लागले. तर्काच्या कवेतही न सामावणा-या व इतिहाससिद्ध नसलेल्या प्रसंगांचेच बाहुल्य अनुभवणे, "आपल्या"तीलच 80-85% माणसां(?)च्या अनाकलनीय दुस्वासाची कारणमीमांसा शून्यवत होणे, सभ्यता व सत्यता यातील तथ्याचे हरवणे,  स्वतःच्याच नव्हे तर संपूर्ण कुटूंबाच्या हत्त्येच्या प्रयत्नांची वारंवारिता उद्भवणे, भ्रष्टाचार रोखू पाहणा-या(?)लाच भ्रष्टाचाराच्या काल्पनिक व खोट्या आरोपांचे वारंवार "स्पष्टीकरण" द्यावे लाग...

मै क्षमाप्रार्थी हूँ.....!

*मै क्षमाप्रार्थी हूँ .........!* ----------------------------------- >> अध्यात्म, धर्म और विज्ञान की त्रयी से निर्मित त्रिभुज बहुत ही गूढ तथा अनिर्णित मानसिक संघर्ष से लिप्त एक आदिम संकल्पना है। हमें हमेशा भ्रम में भ्रमित रखना और धर्म को अध्यात्म तथा अध्यात्म को ही विज्ञान समझने की प्रक्रिया में उलझाएं रखना, यह इस आदिम संकल्पना का अनादि-अनंत खेल रहा है। इसीलिए जब हम धर्मग्रंथों का पठन, मनन, अध्ययन करने लगते हैं, तब हम स्वयं को धार्मिक नहीं आध्यात्मिक पथ के पथिक समझने/मानने लगते हैं। और विज्ञान को अध्यात्म का ही मुखर/अनुगामी अंग भी समझने/मानने लगते हैं।  >> भारतीय संस्कृति में पुरुषार्थ के जो चार आयाम(?) बताये जाते हैं, वे धर्म, अर्थ, काम और मोक्ष Absolute नहीं होते, बल्कि ये चारों मानव-जीवन के चार आश्रमों (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) के भी संपूरक तथा वाहक भी माने जाते हैं। समय, प्रकृति, अवकाश आदि कभी भी स्थिर नहीं होते बल्कि यह सभी हमेशा परिवर्तन-शील ही होते हैं। अतः उपरोक्त दोनों 'चतुष्ट्म्य'(!) का भी परिवर्तन-शील होना बिलकुल स्वाभाविक, प्राकृतिक तथा ल...