एक शोकांतिकाच (!) ------------------------------ (निसर्ग-शरण)आनंद यादव यांच्या संपादकत्वाखाली पुण्याहून एकेकाळी प्रकाशित होत असलेल्या तत्कालीन मराठी मासिक, "विचार भारती" च्या मार्च/एप्रिल 1988 च्या "ग्रामीण साहित्य विशेषांका"त माझा एक लेख "नवोदित ग्रामीण साहित्यिक आणि अभिव्यक्ती : काही विचार" प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यात मी ग्रामीण साहित्यिकांच्या अभिव्यक्ती आणि लिखाणाची तुलना अस्पर्शीत, अनिर्बंध अशा अरण्यात नैसर्गिक वाढ होणा-या वृक्षाशी केली होती, तर बहुतेक "शहरी(?) साहित्य" हे बोनसाय वृक्षासारखे असते असेही सोदाहरण स्पष्ट केले होते. मी आजही आपल्या या मतावर कायम आहे, आणि म्हणूनच मला माझ्या ग्रामीण-स्तर(?)-अभिव्यक्तीची बिलकुल लाज(!) वाटत नाही. मला माझ्या अभिव्यक्ती बद्दल कोणताही न्यूनगंड वा भयगंड नाही. माझ्या गावापासून अगदी दोन किमी वर महाकवी भवभूतीचे गाव, पदमपूर, आहे आणि हा भवभूती आमचा, झाडीपट्टीचा, साहित्यिक-पूर्वज आहे. ज्याने आपल्या अस्सल अभिव्यक्तीशी कोणतीही तडजोड न करता भविष्य-काळावर त्याच्या योग्यतेचे मोजमाप सोपवले. आणि आज आपण भ...
🌿 *ॲड. लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम* : (साहित्यिक अभिमत : by- ChatGPT) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *प्रस्तावना* साहित्य हे अनेकदा माणसाच्या अंतर्मनातील प्रवासाचे रूप असते. काही लेखक हा प्रवास केवळ विचारांमधून करतात, काही अनुभवांमधून; परंतु ॲड. लखनसिंह कटरे हे अशा लेखकांपैकी आहेत, जे हा प्रवास “अनुभव आणि विचार” दोन्हींतून करतात. त्यांचा प्रवास हा द्वैती आहे — एका बाजूला प्रशासकीय जबाबदाऱ्या, कायद्याची भाषिक शिस्त आणि सार्वजनिक सेवकाचे कर्तव्य; तर दुसऱ्या बाजूला संवेदनशील लेखक, लोकभाषेचा संरक्षक आणि करुणामय कवी. हे दोन प्रवाह एकत्र मिसळले की तयार होतो कटरे विचारविश्व — ज्यात शिस्त आणि शहाणपणा यांसोबतच करुणा, आत्मपरीक्षण आणि लोकजीवनाची प्रखर जाणीव आहे. *अनुभवाधिष्ठित लेखन : प्रशासनातून आलेला विचार* ॲड. कटरे यांचे लेखन हे “वास्तवाशी संघर्ष करताना उमटलेले विचार” आहे. “प्रशासन की सुशासन : एक पॅरेडाइम”, “मी सुद्धा एक अधिकारी”, “एक अनुभव : एक आकलन” अशा लेखांत ते शासनव्यवस्थेच्या अंगभूत गुंतागुंतीकडे अत्यंत थेट, परंतु संत...
*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली* *(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन* ------------------------------------------------------------ @ॲड.लखनसिंह कटरे ----------------------------------------------- (1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके (आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचाही काही भाग तथा छत्तीसगढ मधील राजनांदगाव, दुर्ग जिल्ह्यातील भाग) असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे. सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति...
Comments
Post a Comment